IND vs ENG 1st test Day 3 Live Updates in Marathi: भारत वि. इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्या डावात ऑलआऊट झाला आहे. ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्या शतकाच्या जोरावर भारताने चौथ्या दिवशी चांगली फलंदाजी केली. पण भारताची शेपूट पुन्हा एकदा फेल ठरली. भारताने एका षटकात ३ सलग विकेट्स गमावले आणि त्याचा संघाच्या धावसंख्येवर परिणाम स्पष्ट दिसून आला. करूण नायर आणि शार्दुल ठाकूर दुसऱ्या डावातही स्वस्तात बाद झाले.

भारतीय संघ दुसऱ्या डावात ३६४ धावांवर सर्वबाद झाला. यासह भारताकडे ३७० धावांची आघाडी आहे आणि इंग्लिश संघाला पहिल्या कसोटीत विजयासाठी ३७१ धावांचं मोठं आव्हान दिलं आहे. पहिल्या डावापेक्षा भारताने दुसऱ्या डावात कमी धावा केल्या आहेत. आता गोलंदाजीत बुमराहव्यतिरिक्त भारताचे इतर गोलंदाज कशी कामगिरी करतात, यावर सर्वांच्या नजरा आहेत.

इंग्लंडने किती धावा केल्या?

भारतीय संघाने इंग्लंडला पहिली कसोटी जिंकण्यासाठी ३७१ धावांचं आव्हान दिलं आहे. प्रत्युत्तरात इंग्लंडने चौथ्या दिवसाच्या अखेरच्या अर्ध्या तासात ६ षटकांत बिनबाद २१ धावा केल्या आहेत. झॅक क्रॉली १२ धावा तर बेन डकेट ९ धावा करत नाबाद माघारी परतले आहेत. भारताकडून बुमराह आणि सिराज आणि जडेजाने गोलंदाजी केली.

जोश टंगच्या एका षटकात ३ विकेट्स

जोश टंगने ९१व्या षटकात भारताला लागोपाठ ३ धक्के बसले आहेत. पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरला जो रूटकरवी झेलबाद केलं. दुसऱ्या चेंडूवर नुकताच आलेला मोहम्मद सिराज गोल्डन डकवर झेलबाद झाला. हॅटट्रिकवर असलेल्या गोलंदाजाला तिसऱ्या चेंडूवर विकेट नाही मिळाली. पण चौथ्या चेंडूवर त्याने बुमराहला क्लीन बोल्ड करत संघाला तिसरी विकेट मिळवून दिली आहे. यासह भारत ३४९ धावांवर ६ विकेटपासून एका षटकानंतर ३४९ धावांवर ९ विकेट्स अशी अवस्था झाली आहे.

केएल राहुल शतकी खेळीनंतर झाला बाद

केएल राहुलने उत्कृष्ट खेळी करत भारताला संकटातून बाहेर काढत मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं आहे. राहुल २४७ चेंडूत १८ शतकांसह १३७ धावांची खेळी करत क्लीन बोल्ड झाला. ब्रायडन कार्सने त्याला बाद केलं. यासह भारताने ८५ षटकांत ४ बाद ३३४ धावा केल्या आहेत.

टीब्रेकपर्यंत किती धावा

भारतीय संघाने चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात उत्कृष्ट फलंदाजी करत भारताच्या धावसंख्येत महत्त्वपूर्ण धावांची भर घालत संघाचा डाव ४ बाद २९८ धावांपर्यंत नेली. केएल राहुल आणि ऋषभ पंतने १८० अधिक धावांची भागीदारी रचत इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि पहिल्या सत्रातील धावांची कमीदेखील भरून काढली. यासह आता भारताकडे ३०४ धावांची भागीदारी झाली आहे.

ऋषभ पंतचं शतक

ऋषभ पंतने दुसऱ्या डावातही कमालीचं शतक झळकावत संघाच्या धावांमध्ये मोठी भर घातली आहे. ऋषभ पंतने विक्रमी शतक झळकावत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. ऋषभ पंत १४० चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांसह ११८ धावा करत बाद झाला.

केएल राहुलचं शतक

केएल राहुलने दुसऱ्या डावात २०२ चेंडूत १३ चौकारांसह आपलं शतक पूर्ण केलं आहे. सावध पण वेळप्रसंगी आक्रमक फटके खेळत राहुलने आपलं शतक पूर्ण केलं. यासह भारताने २४० धावांची आघाडी मिळवली आहे. तर पंतही शतकाच्या जवळ पोहोचला आहे.

ऋषभ पंतचं अर्धशतक

ऋषभ पंतने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ८३ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ५१ धावा करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. भारतीय संघ यासह २०० धावांच्या जवळ पोहोचत आहे. पहिल्या सत्रात सांभाळून फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या सत्रात दोन्ही खेळाडू अधिक धावा करण्यावर भर देत आहेत.

लंचब्रेकपर्यंत भारताने किती धावा केल्या?

पहिल्या सत्रात ऋषभ पंत आणि केएल राहुलने इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर कमालीची फलंदाजी करत विकेट दिली नाही. भारताने पहिल्या सत्रात २४.१ षटकात ६३ धावा केल्या आणि १ विकेट गमावली. ऋषभ पंत आणि केएल राहुलने अर्धशतकी भागीदारी करत भारताची धावसंख्या १५३ वर नेली आहे. यासह टीम इंडियाकडे १५९ धावांची आघाडी आहे.

केएल राहुल बाद होता होता वाचला

केएल राहुल आणि ऋषभ पंत सावधपणे फलंदाजी करत आहेत. इंग्लंडचे गोलंदाज भेदक गोलंदाजी करत असून दोन्ही फलंदाज डिफेन्स करत आहेत. तर राहुलनेही तितक्याच कमालीच्या गोलंदाजीवर मागच्या बाजूला एक कमालीचा चौकार खेचला. तर पुढच्या चेंडूवर गोलंदाजाला बाऊन्स मिळाला आणि फटका खेळू नको खेळूच्या विचारात राहुलने फटका खेळला आणि स्लिपमध्ये ब्रुकजवळ गेला. पण ब्रुकच्या हाताला लागून चेंडू हवेत उडाला आणि राहुल बाद होता होता वाचला. यासह भारताने ३९ षटकांत ३ बाद १२७ धावा केल्या आहेत.

केएल राहुलचं अर्धशतक 

केएल राहुलने त्याचे कमालीचे कव्हर ड्राईव्ह आणि डिफेंसच्या जोरावर पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. राहुलने ८७ चेंडूत ७ चौकारांसह आपलं १८वं कसोटी अर्धशतक पूर्ण केलं. यासह भारताने १०० धावांच्या आघाडीचा टप्पाही पार केला आहे.

भारताला पहिला मोठा धक्का

शोएब बशीरने त्याच्या षटकातील अखेरचा चेंडू टाकत सामन्याला सुरूवात झाली. पुढील षटक टाकण्यासाठी ब्रायडन कार्सकडे चेंडू सोपवण्यात आला आणि गिल स्ट्राईकवर होता. अखेरच्या चेंडूवर ब्रायडन कार्सचा चेंडू गिल कट मारायला गेला आणि चेंडू स्टम्पसवर आदळल्याने क्लीन बोल्ड झाला. यासह भारताला चौथ्या दिवशी पहिला मोठा धक्का बसला आहे.

पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी काय घडलं?

इंग्लंडचा संघ तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ४६५ धावांवर सर्वबाद झाला. जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने २, प्रसिध कृष्णाने ३ विकेट घेतले. तर इंग्लंडकडून ऑली पोपने शतक, बेन डकेटने ६२ धावा, हॅरी ब्रुक ९९ धावा या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. त्यानंतर भारताने तिसऱ्या सत्रात फलंदाजी करताना २ विकेट्स गमावत ९० धावा केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.