भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पार्ल येथे खेळला गेला. यामध्ये टीम इंडियाला ३१ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर २९७ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ २६५ धावा करू शकला. भारतीय डावात ऋषभ पंत १६ धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने त्याला चपळतेने यष्टीचीत केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ४ गडी गमावून २९६ धावा केल्या. यानंतर टीम इंडिया फलंदाजीला आली. यादरम्यान पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. फेहलुकवायोच्या एका चेंडूवर शॉट खेळण्यासाठी तो क्रीजच्या बाहेर आला. हे पाहताच डी कॉकने संधीचा फायदा घेत अप्रतिमरित्या आणि वेगाने यष्टीचीत केले. https://twitter.com/OfficialCSA/status/1483825237296832517?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1483825237296832517%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Findia-lost-by-31-runs-south-africa-odi-rishabh-pant-stump-out-quinton-de-kock-2042507 हेही वाचा - भारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताचा पराभव ; मधल्या फळीच्या हाराकिरीमुळे पहिल्या लढतीत निराशा शिखर धवनने टीम इंडियासाठी ७९ धावांची शानदार इनिंग खेळली. तर माजी कर्णधार विराट कोहलीने ५१ धावा केल्या. शेवटी शार्दुल ठाकूरने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने ४३ चेंडूत ५० धावा केल्या. ठाकूरनेही ५ चौकार आणि १ षटकार लगावला. मात्र, तो भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.