रविवारी तिरुअनंतपुरममध्ये भारत आणि श्रीलंका अर्ध्या रिकाम्या असणाऱ्या स्टेडीयम मध्ये खेळला गेला. यासाठी काँग्रेसने केरळच्या क्रीडामंत्र्यांना दोष दिला आणि त्यांच्या तिकीट दर कमी करण्याबाबत अलीकडेच केलेल्या वादग्रस्त टिप्पणीला जबाबदार धरले. तर सीपीआय(एम) ने  आम्ही काहीही चुकीचे बोललो नसल्याचा दावा केला आहे. सध्या दक्षिणेकडील राज्यातील तिरुअनंतपुरममधील काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या मते क्रीडा मंत्री व्ही अब्दुरहिमन यांनी काहीही म्हटले तरी, लोकांनी सामन्यासाठी येण्याचे टाळायला नको होते.

एकदिवसीय सामन्यासाठी तिकीटाचे दर अवाजवी असल्याची विविध स्तरातून टीका होत होती. ज्यांना हे परवडत नाही त्यांनी सामना पाहायला जाण्याची गरज नाही असे अब्दुरहिमान यांनी सांगून मोठा वाद निर्माण केला होता. “कर कमी करण्याची काय गरज आहे? देशात महागाई वाढत असल्याचे पहायला मिळत आहे त्यामुळे कर कमी करावा, अशी मागणी करू नये. जे उपाशी आहेत त्यांनी सामना पाहायला जाण्याची गरज नाही,” असे मंत्री म्हणाले होते. तर येथे पत्रकारांशी बोलताना थरूर म्हणाले की, मंत्री जे बोलले ते टाळता आले असते आणि जनतेने सामन्यावर बहिष्कार टाकला नसता.

eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश

“मी सोशल मीडियावर सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणाऱ्या अनेक मोहिमा पाहिल्या. त्यांची मोहीम प्रभावी ठरल्याचे दिसून आले. मला वाटते की त्यावर बहिष्कार टाकणे अतार्किक आहे. मला सामना पाहण्याचे भाग्य लाभले, तसेच जे प्रेक्षक येथे आले त्यांनाही लाभले,” असे काँग्रेसचे खासदार म्हणाले. राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही डी सतीसन यांनीही, अब्दुरहिमान यांनी आपल्या वक्तव्याने मल्याळी लोकांच्या स्वाभिमानावर प्रश्नचिन्ह निर्माण केले असे सांगून मंत्र्यांवर दोषारोप केला. सतीसन म्हणाले की, मंत्र्यांच्या ‘उपाशी’ टिप्पणीमुळे सामना अर्ध्या रिकाम्या स्टेडीयममध्ये खेळला गेला.

हेही वाचा: IND vs SL 3rd ODI: श्रेयस अय्यरच्या गोलंदाजीवर किंग कोहली झाला अवाक्, रिअॅक्शन पाहून तुम्हीही व्हाल थक्क, Video व्हायरल

सीपीआय(एम) चे राज्य सचिव एमव्ही गोविंदन, अब्दुरहिमान यांना फक्त असे म्हणायचे होते की जे गरीब आहेत ते सामना पाहू शकत नाहीत असे सांगून त्यांच्या मदतीला आले. ‘माध्यमांनीच त्यांचे विधान वादग्रस्त करून दाखवले,’ असे गोविंदन म्हणाले. तर केरळ क्रिकेट असोसिएशन (KCA) ने सांगितले की, सध्या सुरू असलेला सबरीमाला यात्रेचा हंगाम, पोंगल सण आणि सोमवारी सुरू होणार्‍या काही CBSE परीक्षांमुळे प्रेक्षक कमी आले.

याशिवाय, KCA चे अध्यक्ष जयेश जॉर्ज यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेले आणखी एक कारण म्हणजे येथे आयोजित केलेला शेवटचा क्रिकेट सामना सप्टेंबर २०२२ मध्ये झाला होता आणि आणखी काहीच महिन्यांनंतर आयोजित करण्यात आलेल्या सामन्यामुळे तिकिटांची विक्री कमी होण्याला कारणीभूत ठरले असावे.

तिरुअनंतपुरम कॉर्पोरेशनचे महापौर आर्य राजेंद्रन यांनी आदल्या दिवशी सांगितले की, तिकीट विक्रीत घसरण कदाचित भारताने आधीच मालिका जिंकल्यामुळे किंवा २०-२० सामन्यांपेक्षा अधिक काल चालणाऱ्या एकदिवसीय सामन्यांमुळे झाली असावी, त्यामुळे लोक तसे करू शकत नाहीत. खेळासाठी खूप वेळ घालवला आहे.

हेही वाचा: Shubman Gill: नक्की कोणती ‘सारा’? शतकवीर गिल क्षेत्ररक्षणसाठी येताच चाहत्यांनी केली चिडवायला सुरुवात, video व्हायरल

मात्र, तिकिटांच्या किमतींवर करमणूक कर वाढवणे किंवा मंत्र्यांचे विधान हे विक्री कमी होण्याचे कारण असू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. कायद्यानुसार २४ ते ४८ टक्के कर आकारला जातो, असे त्या म्हणाल्या. राज्य सरकार आणि केसीए यांच्याशी चर्चा केल्यानंतर कर दर ठरवण्यात आल्याचेही राजेंद्रन म्हणाले. सामना सुरू होईपर्यंत आणखी लोक येतील अशी त्यांना आशा होती. जेव्हा मंत्र्यांच्या विधानाने वाद निर्माण झाला होता, तेव्हा सरकारने म्हटले होते की करमणूक कर प्रत्यक्षात उच्च दरावरून १२ टक्के करण्यात आला आहे.