scorecardresearch

World Cup 2023: वर्ल्डकप २०२३पूर्वी आर. अश्विनचे आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “गंभीरला जेवढे श्रेय हवे होते…”

ICC World Cup 2023: टीम इंडियाच्या एका दिग्गज खेळाडूने भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरबद्दल मोठी टिप्पणी केली आहे. गंभीर २००७ मध्ये टी२० आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य आहे.

He did not get as much credit as he should have Ashwin expressed his pain regarding the world champion player Gautam Gambhir
आर. अश्विनने गौतम गंभीरबाबत आश्चर्यचकित करणारे विधान केले. सौजन्य- (ट्वीटर)

Ravichandran Ashwin comment on Gautam Gambhir: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. आता टीम इंडियाच्या एका दिग्गज खेळाडूने त्याच्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. गंभीर हा २००७ मध्ये टी२० आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. अश्विनने विश्वचषक सुरु होण्यास काही अवधी बाकी असताना एका मुलाखतीत गौतम गंभीरबाबत सूचक विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत जे त्यांच्या कामगिरीनुसार अधिक श्रेय घेण्यासाठी पात्र आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्याला जेवढे श्रेय मिळायला हवे होते ठेवढे मिळाले नाही, असे म्हणता येईल. रविचंद्रन अश्विनने अशाच एका खेळाडूचे नाव घेतले आहे ज्याला त्याच्या कारकिर्दीत म्हणावे तितके श्रेय मिळाले नाही. हर्षा भोगले यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान अश्विनने सांगितले की, “गौतम गंभीर हा एक असा खेळाडू आहे त्याला जेवढे श्रेय मिळायला हवे होते तेवढे मिळाले नाही.”

rohit sharma
१० वर्षांतील अपयशांचे विश्वचषकात दडपण नाही! क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची ग्वाही…
46 days 48 matches and one champion Will India repeat history after 12 years The hosts have won the last three World Cups
World Cup 2023: ४६ दिवस, ४८ सामने अन् एक चॅम्पियन; भारत १२ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती करणार? मागील तीन विश्वचषक जिंकले यजमानांनी
IND vs AUS: Irfan Pathan's statement said If I were Sanju Samson I would be very disappointed
Sanju Samson: सॅमसनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळल्याने इरफान पठाण नाराज; म्हणाला, “मी त्याच्या जागी असतो तर…”
Kapil Dev said that Team India will win the World Cup 2023
World Cup 2023: ‘दिल कुछ कहता है और दिमाग…’; भारताच्या विश्वचषक जिंकण्याच्या प्रश्नावर कपिल देव यांचे वक्तव्य

आर. अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, “गौतम गंभीर हा भारताचा एक महान क्रिकेटपटू आहे. ज्यांना सर्वात कमी महत्व मिळाले असे मला वाटते. तो संघाचा सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे पण, लोकांनी त्याला जितके श्रेय द्यायला हवे होते तितके दिले नाही.” पुढे अश्विन म्हणाला की, “तो एक निःस्वार्थ व्यक्ती होता आहे जो आपल्या कारकिर्दीत नेहमी संघाचा विचार करत असे.” मात्र, अश्विनने गौतम गंभीरबद्दल असे का म्हटले. त्याबद्दल सांगणे थोडे कठीण आहे. याआधी गौतम गंभीरने युवराज सिंगबद्दल म्हटले होते की, “त्याला इतके श्रेय मिळाले नाही.”

गंभीरने दोन विश्वचषक जिंकले

गौतम गंभीरने २००७च्या विश्वचषक फायनलमध्ये चांगली कामगिरी केली होती. पाकिस्तानविरुद्ध सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना त्याने ५४ चेंडूत ७५ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. गंभीरमुळेच टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली. भारताला २०११चा विश्वचषक जिंकून देण्यात गौतम गंभीरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गंभीरने कठीण परिस्थितीत ९७ धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार मारले. भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक जिंकला.

हेही वाचा: Asian Games 2023: महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने वाढवली शान! अविनाश साबळेने एशियन गेम्समध्ये सलग दुसरे पदक जिंकत रचला इतिहास

गौतम गंभीरची कारकीर्द

गंभीरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने भारतासाठी एकूण २४२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान, २८३ डावात त्याच्या बॅटने १०३२४ धावा केल्या आहेत. गंभीरच्या कसोटीत ४१५४ धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५२३८ आणि टी२० क्रिकेटमध्ये ९३२ धावा आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian player ravichandran ashwin made such a big comment on gautam gambhir said did not get that much credit avw

First published on: 04-10-2023 at 23:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×