आयपीएल २०२२चे वेळापत्रक जवळपास निश्चित झाले आहे. आयपीएलचा पंधरावा हंगाम २६ मार्चपासून सुरू होऊ शकतो आणि अंतिम सामना २९ मे रोजी खेळवला जाऊ शकतो. टी-२० लीगच्या चालू हंगामात ८ ऐवजी १० संघ उतरत आहेत. नुकत्याच झालेल्या लिलावात एकूण २०४ खेळाडूंना खरेदी करण्यात आले. यापूर्वी ३३ खेळाडू कायम ठेवण्यात आले होते. म्हणजेच एकूण २३७ खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. या स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने महाराष्ट्रात होणार आहेत. मुंबईत ५५ सामने खेळवले जाऊ शकतात. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक उद्या २४ फेब्रुवारीला होणार आहे.

क्रिकबझच्या बातमीनुसार, आयपीएलच्या साखळी फेरीचे सामने महाराष्ट्रात होणार आहेत. साखळी फेरीत एकूण ७० सामने खेळवले जाणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन ठिकाणी एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत. याशिवाय पुण्यात १५ सामने होणार आहेत. सर्व १० संघ वानखेडे आणि डीवाय पाटील येथे प्रत्येकी ४ सामने खेळतील. याशिवाय त्याला पुणे आणि ब्रेबॉर्नमध्ये प्रत्येकी ३-३ सामने खेळावे लागणार आहेत. चालू हंगामापासून टी-२० लीगमधील सामन्यांची संख्या ६० वरून ७४ वर पोहोचली आहे.

Rolls-Royce
अनंत अंबानींच्या वरातीमधील विदेशी वाहनांवर कारवाई होणार ?
CA final, intermediate,
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर
Non interlocking work auto signaling system and multiple line electrification to disrupt train routes Gondiya
गोंदिया : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे ; ‘या’ रेल्वे रद्द, कामकाज प्रभावित…
News About Cartoon Network
#RIPCartoonNetwork एक्सवर का चर्चेत आलाय हा ट्रेंड? कार्टून नेटवर्क खरंच बंद होणार?
Nagpur Metro, Nagpur Metro Service Disrupted, Nagpur Metro Service Disrupted for Two Hours, Power Line Fault, Nagpur Metro Resumes After Repairs, Nagpur news, marathi news,
ओहरहेड वीज वाहिन्यात बिघाड, नागपुरात मेट्रोची सेवा विस्कळित
Job Opportunity Opportunities in Central Arms Police Forces
नोकरीची संधी: सेंट्रल आर्म्स पोलीस फोर्सेसमधील संधी
Team india Victory Parade Mumbai Police Traffic Advisory Issue Today
Mumbai Traffic Advisory : दक्षिण मुंबईत वाहतुकीत मोठे बदल, वाचा….
The procession of the Twenty20 World Cup winning Indian cricket team was organized in Mumbai sport
दिग्विजयाचा आज मुंबईत जल्लोष; ट्वेन्टी२० विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीचे आयोजन

हेही वाचा – ना शतक, ना फॉर्म..! तरीही विराट कोहलीला मिळालाय ‘असा’ सन्मान; ट्विटरवर उडवलाय धुरळा!

अहवालानुसार, आतापर्यंत आयपीएल प्लेऑफच्या ४ सामन्यांचे ठिकाण निश्चित झालेले नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बाद फेरीचे सामने खेळवले जाऊ शकतात. गुरुवार, २४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत संपूर्ण वेळापत्रकावर चर्चा केली जाईल.