IPL Final 2025 Winner AI Prediction: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात यंदाच्या आयपीएल विजेतेपदासाठी लढत सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने १९० धावा केल्या असून पंजाबसमोर विजयासाठी १९१ धावांचे आव्हान उभे केले आहे.
दरम्यान, या सामन्यात कोण बाजी मारणार याबाबत एआयनेही भाकित वर्तवले आहे. चॅटजीपीटीने वर्तवलेल्या भाकितानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सध्याचा फॉर्म आणि या हंगामात बंगळुरू व पंजाब यांच्यातील हेड-टू-हेड कामगिरी पाहता बंगळुरू थोडक्यात विजय मिळवेल, असे म्हटले आहे.
आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत कोणता संघ बाजी मारणार यावर दोन्ही संघांच्या चहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. अशात ग्रोक, जेमिनी आणि चॅटजीपीटी यासारख्या एआय प्लॅटफॉर्म्सनी अंतिम फेरीत कोणता संघ विजय मिळवणार याचे काय भाकित केले आहे ते पहूया.
ग्रोक एआय
ग्रोक एआयने म्हटले आहे की, आरसीबीचा सध्याचा फॉर्म आणि संतुलित संघ लक्षात घेता, मी असा अंदाज लावतो की, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आयपीएल २०२५ चा अंतिम सामना जिंकेल. जर पावसाने व्यत्यय आणला तर, गट फेरीतील स्थानामुळे पंजाब वरचढ ठरेल.
दोन्ही संघांची ताकद तितकीच असली तरी, क्वालिफायर १ मधील प्रभावी कामगिरी आणि संतुलित संघ यामुळे आरसीबी थोडीशी आघाडीवर आहे. हेझलवूड, सुयश शर्मा यांची गोलंदाजी आणि कोहली व सॉल्ट यांच्यासह इतर फलंदाजांच्या कामगिरीमुळे आरसीबी आणखी सरस ठरते.
जेमिनी एआय
आयपीएलच्या विजेतेपदाबाबत भाकित करताना जेमिनी एआयने म्हटले आहे की, माझ्यामते कदाचित रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे पारडेकडे थोडासे जड आहे.
या हंगामात अलीकडील सामन्यांमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे आरसीबी थोडीशी आघाडीवर असू शकते, परंतु पंजाब किंग्जनेही त्यांच्याकडे कोणत्याही संघाला आव्हान देण्यासाठी फलंदाजीची ताकद असल्याचे दाखवून दिले आहे.
जर मला आरसीबी आणि पीबीकेएस यांच्यातील आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यावर पैज लावण्यासाठी निर्णय घ्यावा लागला, तर तो एक कठीण निर्णय असेल.
चॅटजीपीटी
आरसीबीचा सध्याचा फॉर्म आणि या हंगामात पंजाब विरोधातील त्यांची हेड-टू-हेड कामगिरी पाहता बंगळुरूला थोडक्यात विजय मिळू शकतो, असे चॅटजीपीटीने म्हटले आहे.
आरसीबीचा सातत्यपूर्ण फॉर्म आणि या हंगामात पंजाबवर मागील सामन्यांत मिळवलेले विजय, पाहता, ते अंतिम सामना जिंकण्यासाठी फेव्हरिट मानले जातात. पण, पंजाबची अलीकडील कामगिरी आणि श्रेयस अय्यरचे नेतृत्व बंगळुरूसमोर एक मोठे आव्हान उभे करू शकते.