आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होऊन जवळपास आठवडा झाला आहे. या हंगामात सुरुवातीपासून सर्व सामने अटीतटीचे होत आहेत. आज या हंगामाचा १२ वा सामना खेळवला जातोय. दरम्यान, आयपीएलचा उपांत्य आणि अंतिम सामना कोठे खेळवला जाणार याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. उपांत्य आणि अतिम सामने खेळवण्यासाठी दोन मैदानांची निवडदेखील करण्यात आली आहे.

बीसीसीआयने आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी ६ मार्च रोजी शेड्यूल जारी केले होते. यावेळी बोर्डाने आयपीएलच्या ७० सामन्यांचे वेळापत्रकही जारी केले होते. यावेळी उपांत्य तसेच अंतिम सामने कोठे खेळवले जातील याबद्दल निश्चित माहिती सांगण्यात आली नव्हती. मात्र आता हे सामने कोठे होणार हे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती मिळत आहे.

हेही वाचा >> आयपीएल सुरु असताना आकाश चोप्राने केली अजब मागणी, युजवेंद्र चहलने दिल्ला भन्नाट रिप्लाय, म्हणाला..

आयपीएल २०२२ मधील क्वालीफायर आणि अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाण्याची शक्यता आहे. तसेच या सूचीमध्ये अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमचाही समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा >> पंजाबने सामना जिंकला, पण मैदानात चेन्नईच्या धोनीची चर्चा, रचला ‘हा’ नवा विक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आयपीएलचे ७० सामने महाराष्ट्रात खेळवले जात आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट अकॅडमी स्टेडियम तसेच पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या चार स्टेडियमवर हे सामने खेळवले जात आहेत.