Ishant Sharma thinks Yashasvi Jaiswal has a chance for a century: भारत आणि वेस्ट इंडिज संघात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात बिनबाद ८० धावा केल्या आहे. या सामन्यात रोहितसोबत यशस्वी जैस्वाल सलामीला आला आहे. त्याच्याबद्दल वेगवान गोलंदाज इशांत शर्माने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, ज्याने जिओसिनेमावर एक्सपर्ट म्हणून आपल्या डावाची सुरुवात केली, त्याने दुसऱ्या दिवसाच्या खेळाबद्दल सांगितले, “रोहित शर्मा (नाबाद ३०) आणि यशस्वी जैस्वाल (नाबाद ४०) सुरुवातीच्या तासात त्यांच्या दृष्टिकोनात सावध दिसतील. आपण धावा काढू शकलो नसलो तरी हरकत नाही, असे ते स्वतःला सांगतील. आपल्याकडे आधीच मजबूत आधार असल्याने त्यांना विकेटवर टिकून राहावे लागेल. ते आपला वेळ घेतील आणि उर्वरित ७० धावा करण्याचा प्रयत्न करतील. कारण या सामन्यात अजून बराच वेळ आहे.

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Delhi Capitals vs Gujarat Titans Updates in Marathi
DC vs GT : ऋषभ-अक्षरच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीचा गुजरातवर ४ धावांनी निसटता विजय, मिलरचे अर्धशतक ठरले व्यर्थ
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा

यशस्वी जैस्वाल, जो आपला कसोटी पदार्पण सामना खेळत आहे, त्याच्याबद्दल, इशांत म्हणाला, “आता त्याच्याकडे एक व्यासपीठ आहे, ज्यावर त्याचा डाव तयार केला जाईल. त्याने आधी आपले अर्धशतक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नंतर हळूहळू आपला डाव उभारला पाहिजे. त्याच्यासाठी शतक झळकावण्याची मोठी संधी आहे.” बुधवारी पाहिल्याप्रमाणे, विकेट फिरकीपटूंना साथ देणारी दिसत होती. याबाबत इशांत म्हणाला, “जसा दिवस पुढे जाईल, विकेटही खराब होत जाईल. त्यामुळे भारत सध्या ज्या स्थितीत आहे, त्यांनी ३०० धावांची आघाडी पाहिली पाहिजे जेणेकरून त्यांना दुसऱ्या डावात फलंदाजी करावी लागणार नाही.”

हेही वाचा – IND vs WI 1st Test: ”त्याने दाखवून दिले की तो भारतासाठी…”; प्रग्यान ओझाकडून रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीचे कौतुक

वेस्ट इंडिजवर लक्ष केंद्रित राहिल्यास ते अजूनही पुनरागमन करू शकतात, असा विश्वास इशांतला वाटतो. इशांत म्हणाला, “वेस्ट इंडिजसाठी पहिले सत्र महत्त्वाचे असेल. पहिल्या तासात विकेट्स मिळाल्या नसल्या तरी रनरेटवर अंकुश ठेवून सामन्यात टिकून राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारताची सध्या एकही विकेट न गमावता धावसंख्या ८० धावा आहे. परंतु यजमानांना हे समजेल की जर त्यांनी पहिल्या तासात फक्त २० धावा दिल्या, तर ते नंतर विकेट घेण्याच्या चांगल्या स्थितीत असतील. तिथून, त्यांचे फिरकीपटू चांगली कामगिरी करू शकतात. कारण खेळपट्टी त्यांना साथ देऊ शकते.”