Mumbai Indians on Rohit Sharma: मुंबई इंडियन्सने शुक्रवारी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला आयपीएल २०२४ साठी कर्णधार म्हणून नियुक्त करून मोठी घोषणा केली. मुंबई फ्रँचायझीचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. याचे कारण एकेकाळी सचिन तेंडुलकर होता आणि त्यानंतर रोहित शर्माने ज्या पद्धतीने ही फ्रेंचायझीला पुढे नेले आणि पाच वेळा चॅम्पियन बनवले, त्यामुळे या संघाने जगभरातील लोकांची मने जिंकली. मात्र, शुक्रवारी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे चाहते पूर्ण निराश झाले आहेत. या निर्णयाने रोहित शर्माचा १० वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. या निर्णयाच्या निषेधार्त ४८ तासांनी देखील चाहते वेगवेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करत आहेत. काही वेळापूर्वी ट्वीटर #RIPMumbaiIndians हा ट्रेंड होतोय.

मुंबई इंडियन्सने १५ डिसेंबर रोजी गुजरात टायटन्सकडून ट्रेंड केलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला आयपीएल २०२४ साठी संघाचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्त करून मोठी घोषणा केली. त्यामुळे, पंड्या त्याच्या जुन्या संघात परतल्याच्या फ्रँचायझीच्या निर्णयाने काही चाहते खूश आहेत, परंतु काही चाहते असे आहेत की ते पूर्णपणे चुकीचे मानतात.

Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
sandeep sharma got emotional on unsold ipl 2024 auction after rr vs mi match
RR vs MI: “दोन वर्षांपूर्वी मला कोणी विकत घेतले नाही, पण…” मुंबई इंडियन्सच्या ५ विकेट घेतल्यानंतर संदीप शर्माने व्यक्त केली मनातील ‘ही’ भावना
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

या चाहत्यांबरोबरच क्रिकेटविश्वातील अनेक जाणकारांनाही मुंबईने घेतलेला हा निर्णय समजू शकलेला नाही की, फ्रँचायझीने रोहित शर्माला हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरवण्याचा निर्णय कोणत्या मजबुरीने घेतला होता. त्यामुळे आता आयपीएलच्या आगामी मोसमात रोहित हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. उल्लेखनीय बाब आहे की हार्दिकने २०१५ साली मुंबई इंडियन्सकडून आयपीएल करिअरची सुरुवात केली आणि तो २०२१ पर्यंत मुंबईकडून खेळला.

मात्र, २०२२च्या मेगा लिलावात हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सने त्यांच्या संघात समाविष्ट केले, जिथे त्याने चमकदार कामगिरी केली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने पहिल्याच सत्रात आयपीएल २०२२चे विजेतेपद जिंकले. त्यामुळे २०२३ सालच्या अंतिम फेरीत अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात गुजरातला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

मुंबईने रोहितकडून कर्णधारपद परत घेतल्यानंतर, क्रिकेट चाहते मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने त्याच्याशी केलेला अप्रामाणिकपणा म्हणून पाहत आहे. उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की, २०१३ मध्ये मुंबईची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रोहितने एकूण पाच वेळा संघाला चॅम्पियन बनवले होते. पण आता तो हार्दिकच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ मध्ये खेळताना दिसणार आहे. त्यामुळे ही बातमी समोर येताच, मुंबईने त्याच्या “#RIP MUMBAI INDIANS” वर सुमारे १० लाख फॉलोअर्स गमावले आहेत. ट्वीटर ट्रेंडिंग सुरू झाले आहे आणि चाहते या ट्रेंडसह फ्रँचायझीवर आपला राग काढताना दिसत आहेत.

बद्रीनाथची पोस्ट व्हायरल झाली

चेन्नई सुपर किंग्जचे माजी खेळाडू आणि टीम इंडियाकडून खेळलेले सुब्रमण्यम बद्रीनाथ यांनी ट्वीटरवर एक पोस्ट केली आहे, जी खूप व्हायरल होत आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या पिवळ्या जर्सीतील रोहित शर्माचा फोटो शेअर केला आहे. मात्र, हा एडिट केलेला फोटो आहे. पण त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “काय तर…”म्हणजेच त्याला सांगायचे होते की जर रोहित शर्मा सीएसके मध्ये आला तर. ही पोस्ट रोहितच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. यावर रोहितची पत्नी रितिकाने देखील इमोजी कमेंट केली आहे.

हेही वाचा: IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का, ‘या’ फलंदाजाने घेतली माघार

रितिकाच्या कमेंटवरही सोशल मिडियात चर्चा

चेन्नई सुपर किंग्जने रोहित शर्मासाठी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओवर रोहित शर्माच्या पत्नीने कमेंट केली आहे. या पोस्टच्या कमेंटवर तिने पिवळे रंगाचे हृदय म्हणजेच हार्ट पोस्ट केले. याचा अर्थही ट्वीटरवर वेगळा घेतला जात आहे. लोकांनी असेही म्हटले की रोहित सीएसकेमध्ये येऊ शकतो, हे याचे स्पष्ट संकेत आहे. मात्र, सध्या या सर्व केवळ अफवा आहेत. सध्या असे काहीही नाही आणि आगामी हंगामात फक्त एम.एस. धोनीच संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.