Monty Panesar’s Warning to India : इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसरने टीम इंडियाला इशारा दिला आहे. ऑली पोप आणि टॉम हार्टले यांनी आपली कामगिरी कायम ठेवल्यास भारताला कसोटी मालिकेत ०-५ असा पराभव स्वीकारावा लागू शकतो, असे तो म्हणाला. पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पानेसरने इशारा दिला आहे की, ऑली पोप आणि टॉम हार्टले यांनी हैदराबादमध्ये दाखवलेला खेळ कायम ठेवल्यास पाहुण्या संघ भारताचा सफाया करू शकतो.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या रोमहर्षक सामन्यात इंग्लंडने भारताचा २८ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी पानेसर म्हणाला की, जर पोप आणि हार्टले हैदराबादमध्ये खेळत राहिले, तर इंग्लंड भारताचा सफाया करेल. दुसऱ्या डावात पोपने १९६ धावा केल्या आणि त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले, तर हार्टलेने दुसऱ्या डावात सात विकेट्स घेत आपल्या संघाला हैदराबादमध्ये रोमांचक विजय मिळवून दिला.

RCB's unwanted record
GT vs RCB : गुजरातविरुद्धच्या विजयानंतरही आरसीबीने नोंदवला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत पंजाब किंग्जची केली बरोबरी
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Jos Buttler Officially Changes his Name from Jos to Josh in Mid of IPL 2024 England Cricket Made Announcement With Video
Jos Buttler: जोस बटलरने आपलं नाव बदललं? इंग्लंड क्रिकेटने शेअर केला व्हीडिओ

“इंग्लंड ५-० ने मालिका जिंकू शकेल” –

माजी क्रिकेटपटू माँटी पानेसर म्हणाला, “जर ऑली पोप आणि टॉम हार्टले असेच खेळत राहिले, तर इंग्लंड ५-० ने मालिका जिंकू शकेल. हा खूप मोठा विजय आहे, हे शक्य होईल असे कोणालाही वाटले नव्हते. प्रत्येकाला वाटले होते की इंग्लंड १९० धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर हरेल, परंतु ऑली पोपने एक शानदार खेळी खेळली, जी दीर्घकाळातील सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे आणि रोहित शर्माला याची कल्पना नव्हती.”

हेही वाचा – Sarfaraz Khan : ‘…उत्सव की तैयारी करो’, सरफराजच्या निवडीनतंर सूर्यकुमार यादवने शेअर केली खास इन्स्टा स्टोरी

“विश्वचषक जिंकल्यासारखे वाटत आहे” –

तो पुढे म्हणाला की, हा इंग्लंडच्या सर्वोत्तम विजयांपैकी एक होता आणि इंग्लंडने विश्वचषक जिंकल्यासारखे वाटले. १० वर्षांच्या कालावधीत घरच्या कसोटी सामन्यात भारताचा हा चौथा पराभव ठरला. पानेसर म्हणाले, “इंग्लंडच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम विजयांपैकी हा एक होता. इंग्लंडमध्ये ही मोठी बातमी आहे. कारण विश्वचषक जिंकल्यासारखे वाटत आहे.”

हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात निवड झालेला सौरभ कुमार कोण आहे? जाणून घ्या

इंग्लंडचे २०१२/१३ नंतर भारतीय भूमीवर पहिली कसोटी मालिका जिंकण्याचे लक्ष्य असेल. २०१२ मध्ये ॲलिस्टर कुकने आपल्या संघाला भारताविरुद्ध २-१ ने विजय मिळवून दिला होता. त्यानंतर इंग्लंडने भारतात दोन कसोटी मालिका गमावल्या आहेत. इंग्लंडला २०१६/१७ मध्ये ०-४ आणि २०२०/२१ मध्ये १-३ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. हैदराबादमधील पराभवानंतर, यजमान २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.