टी-२० विश्वचषकाच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने मोठे संकेत दिले आहेत. टीम इंडियाला रविवारी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडशी भिडायचे आहे. अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्याच्या प्रश्नावर विराट म्हणाला, ”तो नेहमीच आमच्या योजनांमध्ये सहभागी असतो. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे.” पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. न्यूझीलंड संघानेही पाकिस्तानविरुद्धची लढत गमावली आहे.

सामन्याच्या एक दिवस आधी मीडियाशी बोलताना विराट कोहली म्हणाला, ”शार्दुल ठाकूर हा हुशार खेळाडू आहे आणि त्याने अनेक प्रसंगी स्वत:ला सिद्धही केले आहे. पण तो संघात कुठे बसतो, हे पाहणे बाकी आहे.” अनेक क्रिकेटतज्ज्ञ हार्दिक पांड्याच्या जागी शार्दुलला संधी देण्याच्या बाजूने आहेत, तर काही लोक वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या जागी. भुवनेश्वरही चांगल्या फॉर्ममध्ये नाही.

Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Hardik Pandya Rohit Sharma
हार्दिकचे कर्णधारपद धोक्यात? क्रिकेटवर्तुळात चर्चा; माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरे
IPL 2024 Chennai Super Kings vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs GT: ‘पहिल्या चेंडूवर सिक्स मारतो’ समीर रिझवीने भावाला दिलं होतं वचन, व्हीडिओ व्हायरल

हेही वाचा – T20 WC : मैत्री जीवाभावाची..! पाकिस्तानच्या विजयानंतर शोएब मलिकनं आफ्रिदीला ठोकला सलाम; पाहा VIDEO

पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानने १० विकेट्सने पराभव केला होता. भुवनेश्वर कुमारला संघातून वगळण्याच्या प्रश्नावर विराट कोहली म्हणाला, ”मला कुणालाही वगळण्याची इच्छा नाही. या खेळाडूंनी आमच्यासाठी दीर्घकाळ चांगली कामगिरी केली आहे. मागच्या सामन्यात आम्ही खराब खेळलो आणि हरलो हे तुम्हाला मान्य करावे लागेल. यासाठी कोणतेही कारण दिले जाऊ शकत नाही.”

टीम इंडियाने २००७ पासून टी-२० विश्वचषक जिंकलेला नाही. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा टी-२० विश्वचषक आहे. या स्पर्धेनंतर तो टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. अशा स्थितीत ते या स्पर्धेत आपली पूर्ण ताकद पणाला लावतील. त्याचबरोबर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला या स्पर्धेसाठी संघाचा मार्गदर्शक बनवण्यात आले आहे.