ज्योती चौधरी-मलिक

साहित्य :

४ वाटय़ा तांदळाचे पीठ, एक नारळ, पाव किलो गूळ, चवीपुरते मीठ, वेलची पावडर, जायफळ.

कृती :

प्रथम पातेल्यात साडेतीन वाटय़ा पाणी घेऊन ते उकळत ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ घालावे. पाणी उकळल्यावर त्यामध्ये पीठ घालून ढवळावे. झाकण ठेवून मंद आचेवर दोन मिनिटं वाफ येऊ  द्यावी. वाफवलेले पीठ चांगले मळून घ्यावे. पिठाचे मुठीएवढे गोळे करून घ्यावेत. (शेवयांचा लाकडी साचा) किंवा चकलीच्या साच्यात पिठाचे गोळे घालून शेवया पाडाव्यात. नारळ खोवून घ्यावा. त्याचे दूध काढून त्यात गूळ, वेलची, जायफळ पावडर घालून रस तयार करावा. भांडय़ात शेवया घेऊन त्यात रस घालून मंद आचेवर ५ मिनिटं शिजू द्यावे. नंतर गरम किंवा थंड करून खायला द्याव्यात. हा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे गावात सणासुदीला अजूनही बनवला जातो.