बॅटरी महाग असतात..

वारंवार बदलण्याची गरज असतेलिथियम-आयन बॅटरींची किंमत भरपूर कमी होत आहे. उच्च कार्यक्षमतेच्या बॅटरीमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करण्यावर भारताचे लक्ष आहे. सध्याच्या ‘ईव्ही’ बॅटरी २,४१,००० कि.मी धावल्यानंतर ९० टक्के क्षमता दर्शवतात. सामान्य भारतीय चालक उपरोक्त अंतरही पार करत नाहीत. जे हे अंतर पूर्ण करतात, ईव्ही कंपन्या त्यांना ८ वर्षांपर्यंत बॅटरीची हमी देत आहेत.

चार्ज करण्यासाठी वेळ लागतो

इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणाऱ्या नागरिकांची सर्वात मोठी चिंता म्हणजे वाहन चार्ज करण्यासाठी खूप तास लागतात. परंतु एखादा उत्तम पार्किंग लॉट किंवा गॅरेज असेल तर बेसिक २४० व्ही पॉवर आउटलेटसह, दररोज रात्री ही वाहने चार्ज केली जाऊ  शकतात. त्यामुळे पेट्रोल पंप किंवा सीएनजी स्टेशनवरील लांब रांगा टाळता येतील. तसेच आता महामार्गावरही चार्जिग केंद्र विकसित होत आहेत. त्यामुळे लांब पल्लय़ावर गाडी चालवणे अधिक सुलभ होणार आहे. सध्याचे सुपरचार्जर हे ३० ते ६० मिनिटांत पूर्ण चार्ज करून देतात. उदा. एमजीचे फास्ट चार्जिंग ५० मिनिटात ‘झेडएस ईव्ही’ ८० टक्केवर टॉपअप करते. एखाद्या ठिकाणी थांबून जेवण करण्याचा हा वेळ आहे. अनेक कंपन्या त्यांच्या पार्किंगच्या जागेतच चार्जिंग स्टेशन बनवण्याबाबत विचार करीत आहेत.

किफायतशीर नसतात

यात आश्चर्यकारक असे काही नाही. कारण नवीन तंत्रज्ञानानुसार सर्वसाधारण घडामोडींचे हे द्योतक आहे. आजच्या लक्झरी बाजारात बहुतांश ‘ईव्ही’ उच्च किमतीला उपलब्ध आहेत. मात्र या स्थितीत वेगाने बदल होत आहे. विशेषत: भारतात सबसिडीद्वारे किंमती कमी केल्या जातात व त्या अधिकाधिक खरेदी करण्याजोग्या ठेवल्या जातात. अमेरिकेच्या फास्ट चेक आउटनुसार ‘ईव्ही’ची सरासरी किंमत ही पेट्रोलवरील कारच्या निम्म्यापेक्षा जास्त असेल. अधिक प्रभावी कुलिंग सिस्टिम व सामान्य वाहनांच्या तुलनेत ‘ईव्ही’मध्ये बदलणारे पार्ट्स थोडेच असल्याने त्यांची देखभालही स्वस्त असेल. यात ऑइलदेखील वापरले जात नाही. विविध कारनिर्मात्या कंपन्या निश्चित पुनर्विक्री मूल्य सुविधादेखील देत आहेत. यात ‘ईव्ही’ची तीन वर्षे मालकी पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना ५० टक्के किमतीवर कार परत देण्याची हमी देत आहेत

दीर्घ पल्लय़ाच्या प्रवासासाठी  उपयुक्त नाहीत

‘ईव्ही’ स्वीकारण्याचे प्रमाण कमी असण्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे हे वाहन एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी योग्य नाही, अशी समजूत. मात्र नव्या काळातील जागतिक स्तरावरील इलेक्ट्रिकल वाहनांमध्ये अत्यंत कार्यक्षम बॅटरीज असून त्या ३०० किलोमीटर अंतरावरील प्रवासाची हमी देतात. येणाऱ्या कालावधीत ईव्ही बाजारात जागतिक स्तरावरील प्रमुख कार उत्पादक कंपन्यांचा प्रवेश अपेक्षित असून सध्याच्या बाजाराला गती मिळत आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झालेल्या ‘ईव्ही’जचे ते स्थानिकीकरण करतात. त्यामुळे भारतातील स्थानिक ग्राहकांच्या मागण्या त्याद्वारे अधिक चांगल्या पद्धतीने पुरवल्या जाऊ  शकतात. तसेच चार्जिंग स्टेशनवर सरकारचा भर वाढत आहे, ज्यामुळे दूरचा पल्ला गाठणे सहज शक्य होईल.

वेग कमी असतो

याआधीही बहुतांश इलेक्ट्रिक वाहनांबाबतची ही सामान्य धारणा होती. पण इलेक्ट्रिक कारचीही स्पर्धा असते, हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. ‘ईव्ही’ संपूर्ण टॉर्कचे रूपांतर करू शकतात, जे द्रुतगतीचा परिणाम प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरतात. कंझ्युमर वाहनांमध्येही ‘ईव्ही’ज २.५ सेकंदात ० ते ९६ किमी प्रतितास वेग धारण करू शकतात. उदा. एमजी झेडएस ईव्ही ०-१०० किमी/प्रतितास केवळ ८.५ सेकंदात कव्हर करू शकते.