अन्न आणि पाणी या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही दररोज ३ ते ४ लिटर पाणी प्यायले तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. बहुतेक लोक जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेचच पाणी पितात. हे टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. डॉक्टर सांगतात की जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने ॲसिडिटी सारख्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. चला जाणून घेऊया जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे काय तोटे आहेत आणि जेवणानंतर किती वेळानंतर पाणी प्यायलं पाहिजे.

जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याचे काय तोटे आहेत?

oral health
तुम्हीही रोज सकाळी कॉफी प्यायल्यानंतर दात घासताय? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची ‘ही’ सूचना; अन्यथा…
What To Eat In Shravan
श्रावणात कोणती धान्य व फळे खाल्ल्याने शरीराला होतो फायदा? आहारतज्ज्ञांनी सांगितलेल्या मीठ- मसाला वापरण्याच्या टिप्स वाचा
can washing your hair regularly for 21 days keep dandruff away what dermatologist experts said read
केस २१ दिवस नियमितपणे धुतल्याने कोंड्याची समस्या दूर होते का? डॉक्टर काय सांगतात, वाचा
navi mumbai, gold, lure,
नवी मुंबई : स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून बोलावले आणि पोलीस असल्याची बतावणी करून १३ लाखांचा दरोडा टाकला 
what is sleepwalking and why people walk in sleep
झोपेत चालल्याने इमारतीवरून पडून मुंबईत एकाचा मृत्यू; काय आहे हा आजार? लोक झोपेत का चालतात? तज्ज्ञ काय सांगतात….
how to take steam correctly
चेहऱ्यावर वाफ घेताना आवर्जून करा ‘ही’ गोष्ट; नाहीतर डोळ्यांना होऊ शकते इजा! लक्षात घ्या डॉक्टरांचा सल्ला….
Five must-follow steps to rescue flooded car
पावसाळ्यात कार पूराच्या पाण्यात अडकल्यानंतर तर काय करावे? नेहमी लक्षात ठेवा या ५ गोष्टी
Why you should steer clear of sprouted potatoes
कोंब आलेले बटाटे खाताय? थांबा, असे करण्यापूर्वी बटाट्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घ्या
  • लठ्ठपणा वाढू शकतो.
  • पचनाच्या समस्या होऊ शकतात.
  • पोटात गॅस सारख्या समस्या असू शकतात.
  • रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते.

जेवणानंतर पाणी कधी प्यावे?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा अन्न शरीरात जाते तेव्हा ते पचायला किमान दोन तास लागतात. यादरम्यान पाणी प्यायल्यास त्याचा पचनावर परिणाम होतो. त्यामुळे अन्न खाल्ल्यानंतर किमान ४५ ते ६० मिनिटांनंतर पाणी प्यावे. जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायचे असेल तर अर्धा तास आधी प्यावे.

जेवल्यानंतर योग्य वेळी पाणी पिण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे

  • जेवणानंतर एक तासाने पाणी प्यायल्यास तुमचे वजन नियंत्रणात राहते आणि तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास कधीच होणार नाही.
  • जेवल्यानंतर योग्य वेळी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पचनसंस्था मजबूत होते.
  • जेवल्यानंतर योग्य वेळी पाणी प्यायल्यास पोटात गॅस आणि ॲसिडिटी सारख्या समस्या होत नाहीत.
  • खाल्ल्यानंतर शरीरात पाणी उशिरा पोहोचले की, शरीर अन्नातील पोषक तत्त्वे चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास सक्षम होते

शरीराच्या तापमानापेक्षा पाण्याचे तापमान कमी असू नये. उन्हाळ्यात लोक घरात पाय टाकतातच थंडगार पाणी पितात. ज्यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होते. परंतु, हिवाळ्यामध्ये लोक पाणी पिण्यास टाळाटाळ करतात आणि यामुळे देखील आपल्या शरीराला खूप त्रास होऊ शकतो.

हेही वाचा >> Copper Water: तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं फायदेशीर? तुम्ही करु नका ‘ही’ चूक

नेहमीच बसून पाणी प्यावे. उभे राहून पाणी पिण्याणे गुडघे दुखीची समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय बाटली किंवा कोणत्याही भांड्याद्वारे वरून पाणी पिण्याऐवजी ते एखाद्या ग्लासात ओतून, व्यवस्थित तोंड लावून प्यावे.