निरोगी राहण्यासाठी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये सर्व प्रकारची पोषक तत्वे आढळतात. त्यामध्ये जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, खनिजे, अँटी-ऑक्सिडंट्स यांसारखे घटक असतात, जे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. मात्र, अनेकजण फळे खाण्याऐवजी रस पिणे पसंत करतात. फळांचा रस पिणे देखील फायदेशीर आहे परंतु त्यातील फळाची साल काढून टाकल्याने फायबर आणि इतर सूक्ष्म पोषक घटक दूर होतात. अशावेळी प्रश्न पडतो की, दिवसभरात किती रस पिणे फायदेशीर आहे? चला तर मग जाणून घेऊयात..

फळांचा रस फायदेशीर आहे की हानिकारक?

amazon primeday sale
‘Amazon Prime Day Sale’ नक्की काय असतो? ग्राहकांना वस्तूंवर मिळणारी सूट खरी असते का?
Five common eye infections you should be aware of this monsoon season
पावसाळ्यात डोळ्यांना होऊ शकतो ‘या’ ५ प्रकारचा संसर्ग? कशी घ्यावी काळजी, तज्ज्ञांकडून जाणून घ्या
five powerhouse superfood is helpful for good for blood health
Superfood For Blood Health : रक्त शुद्ध व निरोगी ठेवण्यासाठी हे पाच सुपरफूड्स ठरतील फायदेशीर
How to protect your skin from common infections during monsoon Tips
पावसाळ्यात त्वचेच्या आणि केसांच्या समस्या त्रास देऊ शकतात; ‘या’ उपायांनी मिळवा लगेच आराम
Benefits Of Drinking Tulsi Water
तुळशीचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे वाचा; सर्वाधिक फायद्यांसाठी कसे करावे सेवन? वाचा आहारतज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
how to drive on hill roads
पावसाळ्यात घाटात गाडी चालवताना जरा जपून; सुखरूप प्रवासासाठी पाळा हे नियम….
Essential motorcycle gear to carry during monsoon rides
पावसाळ्यात फिरायला जाताय? मग अशी करा तयारी; ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
Monsoon foods: Which ones should you eat and which ones should you avoid
Monsoon foods : पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत? डॉक्टरांकडून घ्या जाणून….

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एक कप रसामध्ये ११७ कॅलरीज आणि सुमारे २१ ग्रॅम साखर असते. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो. विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी अजिबात फायदेशीर नाही. फळांचा रस जास्त प्यायल्याने जंत होऊ शकतात. यामुळे गॅस्ट्रिकच्या रुग्णाला त्रास होऊ शकतो.

एका दिवसात किती फळांचा रस प्यावा?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वृ्द्ध व्यक्तींनी दररोज एक ग्लासपेक्षा जास्त रस पिऊ नये, कारण जास्त रस आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतो. त्याचा परिणाम लगेच दिसत नाही पण नंतर शरीरावर परिणाम होऊ शकतो.

रस कधी पिऊ नये?

सकाळी रिकाम्या पोटी रस पिणे टाळावे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सकाळी रिकाम्या पोटी ज्यूस प्यायल्याने पोटातील ॲसिडिटीची समस्या वाढू शकते. त्यामुळे काही खाल्ल्यानंतरच रस प्यावा. दुपारी रस पिणे फायदेशीर आहे.

हेही वाचा >> Ghee Or Butter: लोणी की तूप? उत्तम आरोग्यासाठी कशाची करावी निवड? जाणून घ्या

जर रस नसेल तर तुम्ही काय खाऊ शकता?

डॉक्टर सांगतात की जर तुम्हाला फळांचा रस जास्त आवडत असेल तर फळाचा रस काढल्यानंतर उरलेली सालही खावी कारण त्यात पोषक तत्वे असतात. तसेच रोज रस पिण्यापेक्षा फळे खावी असा सल्ला डॉक्टर देतात.