Surya Grahan (Solar Eclipse) December 2021: विज्ञानानुसार सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे. पण भारतातील ग्रहणांना धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्वही आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहण असणे चांगले मानले जात नाही कारण त्याचा लोकांच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे ग्रहण काळात अनेक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण समाप्तीनंतर दान-पुण्य केल्याने अशुभ परिणाम होत नाही. ४ डिसेंबरला सूर्यग्रहण होणार आहे. या ग्रहणाशी संबंधित संपूर्ण तपशील येथे जाणून घ्या.

सूर्यग्रहण कधी आणि कुठे दिसणार?

४ डिसेंबरला हे ग्रहण होणार आहे. भारतीय वेळेनुसार, ग्रहण सकाळी ११ वाजता सुरू होईल आणि पहाटे तीन वाजून सात मिनिटांनी वाजता संपेल. हे सूर्यग्रहण अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, अटलांटिकचा दक्षिण भाग, ऑस्ट्रेलिया, दक्षिण भागात दिसणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, २०२१ सालचे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण वृश्चिक आणि अनुराधा नक्षत्रात विक्रम संवत २०७८ मध्ये कार्तिक महिन्याच्या अमावस्येला होईल. हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल.

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?

( हे ही वाचा: ‘या’ चार राशीचे लोक असतात खूप निडर; कोणताही धोका पत्करण्यात मागे हटत नाहीत)

सूर्यग्रहणाचा कोणत्या राशीवर परिणाम होईल?

ग्रहणाच्या वेळी सूर्य वृश्चिक आणि ज्येष्ठ नक्षत्रात असेल. यामुळे या राशी आणि राशीच्या लोकांना या ग्रहणाचा सर्वाधिक फटका बसेल असे म्हंटले जात आहे. ग्रहणानंतर काही दिवस प्रत्येक कामात काळजी घ्यावी लागेल. धनहानी होण्याची दाट शक्यता आहे. या काळात घाईघाईत कोणताही निर्णय घेणे टाळा. कोणाचीही फसवणूक होऊ शकते. त्यामुळे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, रागावणे टाळा असा सल्ला दिला जात आहे.

( हे ही वाचा: Airtel वापरकर्त्यांसाठी शेवटची संधी! ‘हे’ रिचार्ज करा आणि वाचवा पैसे!)

सूतक लागणार की नाही?

ग्रहण भारतात होत नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळही वैध ठरणार नाही. सूर्यग्रहणाचा सुतक ग्रहणाच्या १२ तास आधी सुरू होतो. या काळात कोणतेही शुभ कार्य करायचे नाही अशी मान्यता आहे. यासोबतच पूजा करण्यासही मनाई केली जाते. सूर्यग्रहण काळात काहीही न खाण्या किंवा पिण्याचा सल्ला दिला जातो.