उत्तर प्रदेशातील तीन दंगलग्रस्त गावांतील विस्थापित झालेल्या ६६ कुटुंबांनी लोकसभेच्या आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय नेत्यांवरील आपला विश्वास उडाल्याचे या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
जातीय दंगलीच्या वेळी लांक, सिसौली आणि बिटावडा या गावांमधून कुटुंबीयांनी पलायन केले आणि भालवा या दुसऱ्या गावात आश्रय घेतला. तेथील गावकऱ्यांनी या कुटुंबीयांसाठी काही घरे बांधली आहेत. राजकीय नेत्यांवरील आमचा विश्वास उडाला आहे, त्यांनी केवळ आश्वासनेच दिली, कोणतीही मदत केली नाही, असे अहसान या दंगलपीडिताने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2014 रोजी प्रकाशित
मुझफ्फरनगर दंगलग्रस्तांचा निवडणुकीवर बहिष्कार
उत्तर प्रदेशातील तीन दंगलग्रस्त गावांतील विस्थापित झालेल्या ६६ कुटुंबांनी लोकसभेच्या आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे
First published on: 09-03-2014 at 04:01 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muzaffarnagar riot hit families to boycott election say no faith in leaders