पाठीत खंजीर खुपसण्याची आमची संस्कृती नाही. ज्यांची ती संस्कृती आहे; तेच तशी भाषा करतात. भाजप हा व्यक्तिकेंद्रीत पक्ष नसून तो विचारावर चालणारा पक्ष आहे. मी गेलो म्हणून संपले असे होत नाही. जाणारे जातात पण कुणाच्या जाण्याने काहीच संपत नाही, असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना नामोल्लेख न करता लगावला

पाचोरा येथे भाजप कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी महाजन यांनी  महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. भाषणे देऊन आणि ऑनलाइन संवाद साधून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत याचे भान त्यांनी ठेवावे. राज्यात पहिल्यांदाच निष्क्रीय  आणि बेजबाबदार सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीच देणे घेणे नाही, अशी टीका महाजन यांनी केली.