लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या सांगलीसह सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातून १ हजार ३११ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. शक्तीपीठाला समांतर महामार्ग उपलब्ध असताना पिकाउ जमिनीतून महामार्गाचा प्रकल्प राबविण्यास एकसंघपणे विरोध करण्याचा निर्णय कवलापूर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Nashik, farmers, Simantini Kokate, protest, Sinner Ghoti highway, Pandhurli Chauphuli, Samriddhi Highway, construction department, Shivda Pandhurli road, Sinnar taluka, heavy vehicles, road condition, accidents, written assurance, temporary repairs, Sinnar police, nashik news, sinnar news, marathi news, latest news
नाशिक : रस्तादुरुस्तीसाठी सिन्नर-घोटी महामार्गावर आंदोलन
satara police trap in bangalore to catch accused
पाच वर्ष फरार आरोपीस बंगळूर येथे अटक
nashik Mumbai journey marathi news
खड्डे, वाहतूक कोंडीमुळे नाशिक-मुंबई प्रवासाला आठपेक्षा अधिक तास, महामार्गाच्या दुरावस्थेबाबत सोमवारी मंत्रालयात बैठक
mmrda to construct tunnel from vasai fount hotel naka to gaymukh thane
वसई-ठाणे ‘भुयारी’ प्रवास; भुयारी मार्ग, उन्नत रस्त्याच्या २० हजार कोटींच्या प्रस्तावास मंजुरी
Criticism of the opposition over the poor condition of the Nashik-Mumbai highway
नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेवरून विरोधकांची टीक
Hundreds of farmers on road in chikhali block the road against Bhaktimarga
बुलढाणा : ‘भक्तिमार्गा’विरोधात शेकडो शेतकरी रस्त्यावर, चिखलीत ‘रास्ता रोको’
Karnataka Highway Warning Signboard
‘तातडीने अपघात करा’, कर्नाटकच्या महामार्गावरील साइनबोर्डवर विचित्र संदेश; नेमकं प्रकरण काय?
When will the third sea bridge from Nariman Point to Cuff Parade in Mumbai be completed
मुंबईत नरिमन पॉइंट ते कफ परेड तिसरा सागरी सेतू आता तरी मार्गी लागणार का?

नागपूर ते गोवा या नियोजित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटित होत असून कवलापूर (ता. मिरज) येथे यासंदर्भात बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीचे निमंत्रक दिगंबर कांबळे यांनी महामार्गामुळे पिकाउ जमिनी जाणार असल्याने अल्प व अत्यल्प भूधारक भूमीहिन होणार असल्याचे संगितले.

आणखी वाचा-सांगलीतील मैत्रीपूर्ण लढतीचा उद्या दिल्लीत निर्णय

यावेळी बोलताना ते म्हणाले, या महामार्गाची कोणीही मागणी केली नव्हती. सध्या नागपूर रत्नागिरी हा महामार्ग नियोजित प्रकल्पाला समांतर असताना पुन्हा हा नव्याने महामार्ग प्रस्तावित करण्याचे काहीच कारण नाही. माणसाच्या जगण्यासाठी संविधानिक तरतुदी आहेत, मारण्यासाठी नाहीत. या मार्गाने शेतकर्‍यांसह अनेक समाजघटक देशोधडीला लागणार आहेत. केवळ मूठभर लोकांचे हित त्यामागे लपले आहे. संघर्ष समितीने महामार्गबाधित शेतकर्‍यांच्या २२ मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत. त्या मान्य झाल्या, तरच शेतकरी संमती देतील. कांबळे म्हणाले, हा लढा दीर्घकाळ अविरत चालणार आहे. शेतकर्‍यांची एकजुटच शासनाला नमवेल. महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे.

या प्रस्तावित महामार्गाबाबत सांगलीतून ६११, कोल्हापूरमधून ४५० आणि सोलापूरमधून २५० अशा १ हजार ३११ हरकती शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. या हरकतीवर सुनावणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. सुनावणीदरम्यान शेतकर्‍यांचा एकसंधपणा दिसण्यासाठी कोणती भूमिका घ्यायची याचे मार्गदर्शन मेळाव्यात करण्यात आले. भूषण गुरव यांनी प्रास्ताविक केले. घनशाम नलावडे, राहुल जमदाडे, प्रवीण पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. शरद पवार यांनी आभार मानले.