सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे अपघात आणि इतर जीवित हानी रोखण्यासासाठी संवेदनशील ठिकाणी सुरक्षा कुंपणाचे काम हाती घेण्यात आले आहे. दौंड ते वाडी दरम्यान रेल्वेमार्गावर अतिसंवेदनशील आणि संवेदनशील ठिकाणे निश्चित करून तेथे सुमारे १५ किलोमीटर अंतराचे सुरक्षा कुंपण उभारण्यात आले आहे. याच रेल्वेमार्गावर अक्कलकोट भागातील अतिसंवेदनशील असणाऱ्या बोरोटी ते दुधनी दरम्यान सर्वात लांब २.४ किलोमीटर इतके तारेचे कुंपण उभारण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकामुळे कॉ. पानसरे यांची हत्या, कुटुंबियांचा उच्च न्यायालयात दावा

Megablack on Central Railway on Sunday Mumbai news
Central Railway Mega block :मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लाॅक
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Mumbai, Speed ​​limit,
मुंबई : राम मंदिर – गोरेगाव – मालाड विभागात वेगमर्यादा
Mumbai municipal administration, water accumulate,
मुंबई : रेल्वे रुळांवर पाणी का साचले ? पालिका प्रशासनाचे विचार मंथन
mumbai local train update central railway announce mega block on sunday
Mega Block On Central Railway : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक;असं असेल लोकलचं वेळापत्रक
central railway cancelled 10 ac local service
मध्य रेल्वेचा ‘पांढरा हत्ती’ प्रवाशांसाठी त्रासदायक; वातानुकूलित लोकलच्या दहा फेऱ्या रद्द
Mumbai, block on Western Railway, mega-block,
मुंबई : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
kdmc issue notices illegal shops near kopar railway station
कोपर रेल्वे स्थानकाजवळील बेकायदा गाळ्यांना नोटिसा; रेल्वे मार्गातील जिना बंद करून गाळ्यांची उभारणी

हेही वाचा – जरांगे-पाटील यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार करा, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

संवेदनशील असणाऱ्या बाळे-सोलापूर आणि बोरीवेल-मलठण अशा दोन ठिकाणी ४०० मीटर इतक्या सुरक्षा कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे. या संरक्षक कुंपणामुळे रेल्वे गाड्यांचा वेग हा प्रतितास १३० किलोमीटरपर्यंत वाढू शकणार आहे. यातून सुरक्षितताही जपण्यास मदत होणार आहे. मागील वर्षभरात सोलापूर विभागातील रेल्वेमार्गावर सुमारे शंभरपेक्षा जास्त जनावरे रेल्वेगाड्यांखाली चिरडली गेली होती. त्याचा विचार करता स्थानिक शेतकरी आणि गोपालकांनी आपली जनावरे रेल्वेरूळाजवळ आणू नयेत. अन्यथा रेल्वे सुरक्षा बलाकडून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.