महाराष्ट्रात अस्वस्थेमुळे माय-बाप जनतेचं नुकसान होत आहे. २०० आमदारांचं सरकार असूनही स्थिर नाही, असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. २०० आमदारांचा पाठिंबा असणारे सरकार स्थिर नाही, असं कसं म्हणू शकतो? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“महाराष्ट्रातील अस्वस्थेमुळे माय-बाप जनतेचं नुकसान होत आहे. २०० आमदारांचं सरकार आहे. पण, स्थिरपणा देत नाही. याने राज्याच्या विकासाचं नुकसान होत आहे. दिल्लीतून पाहते, तेव्हा महाराष्ट्राचा विकास दीड वर्षात थांबल्याचं दिसते. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. हा राजकीय नाहीतर सामाजिक विषय होऊ शकतो,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
Should Ajit Pawar resign in Badlapur incident Supriya Sule declined to answer
बदलापूर घटनेप्रकरणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? सुप्रिया सुळेंनी उत्तर देणे टाळले
nirbhaya mother mamata banerjee
Kolkata Doctor Murder : कोलकाता बलात्कार प्रकरणावरून निर्भयाच्या आईचा ममता बॅनर्जींवर संताप; म्हणाल्या, “त्या केवळ लोकांचं…”
Himanta Biswa Sarma Assam BJP divide to fore Ashok Sarma
‘अडचण हेमंत बिस्वा शर्मा यांची आहे!’ आसाम भाजपामध्ये दुफळी; ‘जुने विरुद्ध नवे’ वाद चव्हाट्यावर
sanjay raut reaction on raj thackeray attacked
Sanjay Raut : “ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, पण…”; राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्याच्या घटनेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

हेही वाचा :

याबद्दल पुण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “२०० आमदारांचा पाठिंबा असणारे सरकार स्थिर नाही, असं कसं म्हणू शकतो?”

हेही वाचा :

आमदारांच्या सुनावणी वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत, याबाबत प्रतिनिधींनी प्रश्न केल्यावर अजित पवारांनी म्हटलं, “प्रत्येकाचं वेगवेगळं काम सुरू आहे. सरकार आपलं काम करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासाला महत्व देतात. पण, प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुणी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाकडे गेलं आहे. ही एक वेगळी प्रक्रिया आहे.”

“एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महायुतीचं काम चालू आहे. आम्ही लवकरच राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहोत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळही मागून घेतली आहे. या बैठकीला मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहोत,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.