राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या विधानांमुळे किंवा राज्य सरकारवर केलेल्या टीकेमुळे चर्चेत असतात. देवेंद्र फडणवीसांप्रमाणेच अमृता फडणवीस देखील राज्य सरकारवर आक्रमकपणे टीका करतात. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यातील भाजपा रणनीती आखत असली, फडणवीस राज्यातल्या भाजपासाठी महत्त्वाचे नेते असले, तरी अमृता फडणवीस यांच्यासाठी मात्र देवेंद्र फडणवीस हे आवडते नेते नाहीत! अमृता फडणवीसांसाठी तेच आवडते नेते असतील, असा अपेक्षित समज असताना, त्याला फाटा देत अमृता फडणवीसांनी विदर्भातल्या दुसऱ्याच नेत्याचं नाव घेतलं! यावेळी मिश्किल टिप्पणी करताना “घर की मुर्गी दाल बराबर”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना अमृता फडणवीस यांना त्यांच्या आवडत्या नेत्याविषयी विचारणा करण्यात आली. “तुमचे आवडते नेते कोण?” असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उपस्थितांना अपेक्षित उत्तर होतं “अर्थात देवेंद्र फडणवीस!” पण झालं भलतंच. उलट अमृता फडणवीसांना घर की मुर्गी दाल बराबर वाटतेय!

lok sabha election 2024 dcm devendra fadnavis slams uddhav thackeray in daryapur rally
सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट! उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांची टीका
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
jitendra awhad marathi news, jitendra awhad latest news in marathi
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “भाजपची जादू संपलेली आहे”

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

आवडत्या नेत्याबद्दल विचारणा करताच अमृता फडणवीस मिश्किलपणे म्हणाल्या, “माझं या प्रश्नावर उत्तर फार सोपं आहे. याचं उत्तर देणं माझ्यासाठी फार काही कठीण नाही. हे पाहा, सगळ्यांसाठीच घर की मुर्गी दाल बराबर असते. त्यामुळे माझे आवडते नेते नितीन गडकरी आहेत”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या उत्तराची राजकीय वर्तुळात देखील चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

अमृता फडणवीस यांचा उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाल्या, “आमची फक्त एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे…”!

उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा!

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर देखील टीका केली आहे. “महाराष्ट्रात सध्या मै खाउंगा भी, खिलाऊंगा भी और खानेवालोंकी रक्षा भी करूंगा अशी परिस्थिती सुरू आहे. महाराष्ट्रात आमची एकच अपेक्षा आहे की प्रगतीचं राजकारण व्हायला हवं. भ्रष्टाचार बंद व्हायला हवा”, असं त्या म्हणाल्या आहेत.