काँग्रेसच्या पराभवाला त्यांचा मी पणा, घराणेशाही आणि मंत्र्यांचे घोटाळे कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर हजारे यांनी शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली. या वेळी हजारे म्हणाले, की काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींना मी पणा आला होता. ते भाषणातसुद्धा चिडायचे म्हणून जनतेने आता त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. देशात स्थिर सरकार आले तर प्रलंबित असलेले कायदे तयार होतील असा आशावादही हजारे यांनी व्यक्त केला.