Bhagat Singh Koshyari Controversial Comment on Mumbai in Marathi : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यात भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोश्यारींच्या या वक्तव्यावरून नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी राज्यपालांचा हा वादग्रस्त व्हिडीओ ट्वीट टीका केली. तर दुसरीकडे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी "राज्यपालांनाच नारळ दिला पाहिजे" म्हणत निशाणा साधला आहे.