महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे, मराठी माणसांचे राज्य आहे. ज्या दिवशी शिवाजी महाराजांचे मावळे रस्त्यावर उतरतील त्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सळो की पळो करून सोडतील, असा इशारा काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी दिला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईत महाराष्ट्रातून गुजराती व राजस्थानी चालले गेले तर महाराष्ट्रात काहीही उरणार नाही असे वक्तव्य केले. राज्यपालांच्या या वक्तव्यावरून आता चांगलाच गदारोळ माजला आहे. सर्व ठिकाणाहून राज्यपाल यांच्यावर टीका होत असतानाच काँग्रेस खासदार धानोरकर यांनीही कडक शब्दात इशारा दिला आहे. तुम्ही राज्यपाल आहात याचा अर्थ तुम्ही काहीही बोलले पाहिजे, असे नाही. तुमचे पद काय याचा विचार करूनच वक्तव्य केली पाहिजे.

उत्तराखंडमध्ये यांना कोणी विचारत नाही, मुख्यमंत्री म्हणून निवृत्त झालेले हे लोक आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्रात राज्यपाल बनविले हे आणि हे आम्हाला शिकवतात का? गरज नाही या महाराष्ट्राला अशा लोकांची. राज्यात जे उद्योगपती तयार झाले ते महाराष्ट्राने, मराठी माणसाने तयार केले. असे माज आल्यासारखे राज्यपालांनी काम करण्याची अजिबात गरज नाही, असेही धानोरकर म्हणाले.

Yavatmal Washim lok sabha seat, Bhavana Gawali, Rajshree Patil, Campaign for Mahayuti, bhavana gawali with Rajshree Patil, bhavana gawali Campaign, shivsena, lok sabha 2024, election 2024, mahayuti, yavatmal news, washim news, bhavan gawali news, marathi news,
दिल्लीवारी हुकलेल्या भावना गवळी म्हणतात, राजश्री पाटील यांना दिल्लीत पाठवा….
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी
pimpri, dr amol kolhe , shivajirao adhlrao patil, criticise, insulting, artist, lok sabha 2024, shirur constituency, maharashtra politics, marathi news,
‘गोविंदाचे स्वागत अन् मला नाटक्या, नौटंकी…’, डॉ. अमोल कोल्हेंचे शिवाजीराव आढळराव पाटलांना प्रत्युत्तर, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार