सातारा: भुईंज (ता. वाई) येथे कायदा सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या भोसले टोळीला पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. भुईंज पोलीस ठाण्यातून सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी हा प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावाची चौकशी वाई उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण भालचिम यांनी केली होती.
मयूर शिवाजी भोसले (भुईंज, ता. वाई), संदीप सुरेश पवार (भुईंज), विशाल सुभाष भोसले (विराटनगर, पाचवड), अमर विलास माने (विराटनगर, पाचवड, वाई) या चौघांना सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत या टोळीने खंडणी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, मारामारी, वाहन पेटवणे यांसारखे गंभीर गुन्हे केले होते. त्यांना वेळोवेळी समज तसेच कायदेशीर कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात फरक पडला नव्हता. सातारा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हद्दपारी मोका, एमपीडीए यांसारख्या कारवाया सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिला आहे.
भुईंज पोलिसांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावाची चौकशी वाई उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण भालचिम यांनी केली. हद्दपार प्राधिकरणाचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी या प्रस्तावाच्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार या टोळीला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. सातारा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हद्दपारी मोका, एमपीडीए यांसारख्या कारवाया सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिला आहे.
सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, अनुराधा सणस व सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते यांनी योग्य ते पुरावे सादर करत सहकार्य केले. मयूर शिवाजी भोसले (भुईंज, ता. वाई), संदीप सुरेश पवार (भुईंज), विशाल सुभाष भोसले (विराटनगर, पाचवड), अमर विलास माने (विराटनगर, पाचवड, वाई) या चौघांना सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत या टोळीने खंडणी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, मारामारी, वाहन पेटवणे यांसारखे गंभीर गुन्हे केले होते. त्यांना वेळोवेळी समज तसेच कायदेशीर कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात फरक पडला नव्हता. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, अनुराधा सणस व सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते यांनी योग्य ते पुरावे सादर करत सहकार्य केले.