scorecardresearch

Premium

औरंगाबाद अन् उस्मानाबादनंतर अहमदनगरचंही होणार नामकरण?, गोपीचंद पडळकरांचं सूचक विधान; म्हणाले…

औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगर शहराचं नामकरण करण्याची मागणी पुढे आली आहे.

gopichand-paradkar
संग्रहित फोटो

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा रखडला होता. औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याची मागणी केली जात होती. अखेर औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचं नामकरण करण्याच्या प्रस्तावा केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. औरंगाबादचं ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं ‘धाराशिव’ नामकरण केलं जाणार आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगर शहराचं नामकरण करण्याची मागणी पुढे आली आहे.

अहमदनगर हे शहर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान आहे, त्यामुळे अहमदनगर शहराचं नाव अहिल्यानगर करावं, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात अहमदनगरचं नामकरण अहिल्यानगर होणारच… असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी एक ट्वीट करत दोन्ही शहरांच्या नामकरणाला मंजुरी मिळाल्याबद्दल शिंदे- फडणवीस सरकारचं अभिनंदनंही केलं आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

हेही वाचा- “परकीय आक्रमकांच्या…”, औरंगाबादच्या नामकरणाला मंजुरी मिळताच राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

गोपीचंद पडळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं नामांतर ‘धाराशिव’ केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ होणारच…” असा विश्वास गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केला.

हेही वाचा- महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले…

औरंगाबादचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानबादचे नामांतर धाराशिव करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने केलेल्या पाठपुराव्यामुळे नामांतराचा प्रश्न सुटला. आता अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर सुद्धा शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वातच होणार आहे, असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp gopichand padalkar demand change name ahmednagar as ahilyanagar after changing names aurangabad and osmanabad rmm

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×