भारतीय जनता पक्षाने राज्यसभेच्या जागेसाठी स्वतःचा उमेदवार उभा करण्याऐवजी मला पाठिंबा दिला, यातून खरंच त्यांना सामाजिक बदल घडवून आणायचा असल्याचे दिसते, असे मत रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शुक्रवारी नागपूरमध्ये व्यक्त केले.
भाजपने राज्यसभेच्या जागेसाठी रामदास आठवले यांनाच उमेदवारी दिली आणि ही निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे आठवले राज्यसभेवर निवडूनही गेले. त्या पार्श्वभूमीवर येथे पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, शिवसेना-भाजपशी करण्यात आलेली युती ही केवळ सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आहे. राज्यातील महायुती लोकसभेच्या ३५ तर विधानसभेच्या १७० जागा जिंकेल, असेही भाकीत त्यांनी केले. रिपब्लिकन पक्षाला लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या ३० जागा हव्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2014 रोजी प्रकाशित
‘सामाजिक बदल घडवून आणण्यासाठीच भाजपकडून मला उमेदवारी’
भारतीय जनता पक्षाने राज्यसभेच्या जागेसाठी स्वतःचा उमेदवार उभा करण्याऐवजी मला पाठिंबा दिला, यातून खरंच त्यांना सामाजिक बदल घडवून आणायचा असल्याचे दिसते, असे मत रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शुक्रवारी नागपूरमध्ये व्यक्त केले.
First published on: 31-01-2014 at 07:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp has shown it wants social change athawale