नक्षलवाद्यांशी असलेल्या कथित संबंधांच्या आरोपांखाली अटकेची कारवाई झालेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा आणि इतर पाच जणांची आज मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात यासंदर्भातली सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. अखेर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं साईबाबा व त्यांच्यासह इतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

न्यायमूर्ती विनय जोशी व न्यायमूर्ती वाल्मिकी एस. ए. मेनेझेस यांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली होती. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. साईबाबा व इतर पाच जणांवर सत्र न्यायालयाने २०१७ साली दोषनिश्चिती केली होती. त्याविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयासमोर सविस्तर सुनावणी पार पडल्यानंतर आज न्यायालयाने यासंदर्भातला निकाल दिला आहे.

Court order to government departments including Nashik municipal corporation regarding slums nashik
झोपडपट्टीविषयी तीन आठवड्यात सिद्धार्थनगर बाजू मांडा – न्यायालयाचे नाशिक मनपासह शासकीय विभागांना आदेश
Hinganghat, admission,
वर्धा : ॲडमिशन टळल्यास महाविद्यालय इतरत्र जाणार? वैद्यकीय महाविद्यालय जागेसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव
dusu attack
Delhi University Students Union : दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनाच्या कार्यालयात हल्ला, ABVP चे पदाधिकारी म्हणाले…
27 female students were illegally kept on rent in the girls hostel of Government Engineering College Chandrapur
कमालच आहे राव… प्राध्यापिकांनी वसतिगृहात चक्क २७ विद्यार्थिनींना भाड्याने ठेवले
nmc denies mbbs permission to 8 proposed medical colleges in maharashtra
राज्यातील आठ वैद्याकीय महाविद्यालयांना प्रवेशमनाई; अपुरी यंत्रसामग्री, मनुष्यबळाचा अभाव असल्याचा ठपका
Candidates will have to wait for professor recruitment pune
प्राध्यापक भरतीची रखडपट्टी… उमेदवारांना करावी लागणार प्रतीक्षा
Crime against the wife of then Deputy Director of Education case of accumulation of unaccounted assets
पुणे : तत्कालीन शिक्षण उपसंचालकासह पत्नीवर गुन्हा, बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचे प्रकरण
Vice-Chancellor Chowdhary,
कुलगुरू डॉ. चौधरींचे अखेर दुसऱ्यांदा निलंबन, राज्यपालांनी कायदेशीर बाबी तपासून घेतला निर्णय

राज्य सरकारची याचिका प्रलंबित

दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत साईबाबा व इतर पाच जणांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आल्याचं वृत्त ‘बार अँड बेंच’नं दिलं आहे. राज्य सरकारनं उच्च न्यायालयाच्या निकालावर स्थगिती आणण्याची कोणतीही मागणी केलेली नाही. त्यामुळे साईबाबा व इतर पाच जणांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्याचं मानलं जात आहे.

शहरी नक्षलवाद : मिथक की वास्तव?

याआधीही झाली होती निर्दोष सुटका!

दरम्यान, साईबाबा यांची १४ ऑक्टोबर २०२२ रोजी उच्च न्यायालयातील याआधीच्या घटनापीठानं निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाचा हा निकाल रद्द ठरवत उच्च न्यायालयात नव्याने या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. तो निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.

साईबाबांवर काय आरोप होते?

मार्च २०१७ मध्ये गडचिरोलीतील सत्र न्यायालयाने साईबाबा व इतर आरोपांना नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याच्या व त्यातून देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांमध्ये दोषी ठरवलं. साईबाबा व इतर दोन आरोपांकडे भूमीगत नक्षलवाद्यांना वितरीत करण्यासाठीचं साहित्य सापडल्याचं न्यायालयानं मान्य केलं. तसेच, यातून लोकांना हिंसक कारवायांसाठी भडकवण्याचा हेतू असल्याची बाबही सत्र न्यायालयानं मान्य केली होती.

BLOG: शहरी माओवाद किंवा Urban Naxal हे जुनंच दुखणं!

साईबाबा यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती रोहित देव यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटकाही केली. मात्र, महाराष्ट्र सरकारने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्द ठरवत पुन्हा सुनावणीचे आदेश दिले. त्यानंत आता दुसऱ्यांदा जी. एन. साईबाबा निर्दोष असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.