बैलाचा पाय घसरल्याने बैलगाडी तलावात कोसळल्याने एकाच कुटूंबातील चौघांसह दोन बैल आणि एक गाय यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथे घडली. या घटनेत तीन जणांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले असून त्यांच्यावर पारोळ येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कन्हेरे येथील विक्रम पाटील (६५) हे सकाळी दहाच्या सुमारास कुटुंबियांना बैलगाडीतून शेतात घेऊन जात होते. तलावाजवळील रस्त्याने गाडी जात असताना एका बैलाचा पाय घसरल्याने बैलगाडी तलावात कोसळली.
या घटनेत विक्रम पाटील यांच्यासह त्यांची पत्नी पद्माबाई (६०), सून मनिषा (३०), नातू मयूर (१०) यांचा बुडून मृत्यू झाला. परिसरातील ग्रामस्थांनी त्वरीत मदतकार्य सुरू केल्याने कल्पनाबाई संजय पाटील (३५), समाधान विक्रम पाटील (३५), भुरा समाधान पाटील या तिघांचा प्राण वाचू शकला. पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cart fall in lake 4 killed in jalgaon
First published on: 13-10-2014 at 02:39 IST