गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. जगातील सर्वांत उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. ३१ ऑक्टोबर रोजी या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. सध्या सुरु असलेल्या पुतळ्याच्या वादावर ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील पत्र लिहिणारे अरविंद जगताप यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून अरविंद जगताप यांनी लिहिलेले पत्र महाराष्ट्रभर पोहोचली. संवेदनशील लेखणीमुळे मराठी जनसमूहात त्यांनी मानाचं स्थान मिळवलं. सध्या सुरु असलेल्या पुतळ्यांच्या वादानंतर जगताप यांनी लिहिलेली पोस्ट थेट हृदयाला भिडते. ‘एवढ्या धुळीत, उन्हातान्हात, पावसापाण्यात ताटकळत वर्षानुवर्ष उभं राहणं कुणाला आवडेल का? जिवंतपणी आपल्यासाठी प्रचंड हालअपेष्टा सोसलेल्या लोकांना आपण अजूनही फक्त वेदनाच देतोय असं वाटतं,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी सत्य परिस्थिती मांडली आहे, असं मत नेटकऱ्यांनी मांडलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chala hawa yeu dya fame arvind jagtap post on statue trending on social media
First published on: 12-10-2018 at 16:19 IST