राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मुंबईचे महापौर ते उपमुख्यमंत्री अशी पदं भूषवली. त्यांनी सत्तेत असताना अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. मात्र छगन भुजबळ यांच्या या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना मुंबईच्या महापौरपदाची कारकीर्द जास्त आवडते. त्याची काही कारणंही त्यांनी सांगितली आहेत. छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीवर त्यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी यावर सविस्तर भाष्य केले आहे.

हेही वाचा >>> ‘काय झाडी, काय हाटेल’ म्हणणाऱ्या शहाजीबापूंवर ‘काय ते ट्रॅफिक’ म्हणण्याची वेळ; तासभर अडकले वाहतूक कोंडीत

eknath shinde sanjay raut (1)
“२०१९ मध्ये शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, पण…”, राऊतांनी सांगितल्या आतल्या घडामोडी; फडणवीस-तटकरेंचा उल्लेख करत म्हणाले…
Prithviraj Chavan on Uddhav Thackeray
विधानसभेनंतर मविआचं सरकार आल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील का? पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला फार्म्युला
cm eknath shinde slams uddhav thackeray over 93 blasts convict campaigning for ubt sena
ठाकरे गटाकडून पाकिस्तानची हुजरेगिरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
Uddhav Thackeray and Sanjay Shirsat
संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “दाढीवाल्यांच्या नादी…”
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
CM Eknath Shinde
“पंतप्रधान मोदी विश्वनेते, कुणीही नाद करायचा नाही”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग

मी मुंबईचा महापौर झालो होतो. त्याची आठवण मला सातत्याने येते. मी त्यावेळी अतिशय लोकप्रिय महापौर होतो. तेव्हा मी ‘सुंदर मुंबई, मराठी मुंबई’ ही घोषणा देऊन कामाला लागलो. बॉम्बेचं मुंबई हे नाव करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया येथे मोठी सभा झाली. या सभेसाठी बाळासाहेब ठाकरे हेदेखील उपस्थित होते. या सभेला सर्व धर्माचे लोक, नेते उपस्थित होते. मुंबईत आम्ही ट्रॅफिक अलर्टची सुरुवात केली होती. तेव्हा आम्ही मुंबई विकायला निघालो आहोत, असे काही वर्तमानपत्रांनी लिहिले, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा >>> राज्यातील माजी मंत्री हाती बांधणार शिवबंधन! शिंदे गटातील मंत्र्याला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक

मला महापौर हे आवडीचे पद मिळाले होते. या पदाने मला मान, सन्मान दिला. माझ्याकडे तेव्हा लाल दिव्याची, लाल रंगाची एक गाडी होती. मी या गाडीत असलो की लोक मला भुजबळ साहेब चालले असे म्हणायचे. लोक मला विसरत नव्हते. मी त्या गाडीत पूर्ण महाराष्ट्र फिरलो. यातूनच शिवसेना वाढत गेली. लोकांना वाटायचं हा आपल्यातला माणूस आहे. अशीच एकदा काँग्रेस स्थापनेची शताब्दी होती. तेव्हा राजीव गांधी मुंबईत येणार होते. तुम्ही मुंबईत येणार आमचे पाणी घेणार. कचरा करणार. मग या शहराला तुम्ही काय देणार? असे मी त्यांना विचारले होते. त्यानंतर राजीव गांधी यांनी मुंबईसाठी १०० कोटी रुपये दिले होते. याच पैशातून नंतर धारावीमध्ये पहिल्यांदा इमारती उभ्या राहिल्या, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली.

हेही वाचा >>> अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यावर ठाकरे गटाचे गंभीर आरोप

पुढे बोलताना भुजबळ यांनी त्यांच्या ६० व्या वाढदीवशाची आठवण सांगितली. साठाव्या वर्षीचा वाढदिवस शिवाजी पार्कवर झाला. त्यावेली विलासराव देशमुख, शरद पवार, लालूप्रसाद यादव यांच्यापासून देशातील अनेक नेते हजर होते. पूर्ण शिवाजी पार्क, शिवाजी पार्कजवळचे रस्ते लोकांनी फुलून गेले होते. बिहारपासून रेल्वेगाड्या आल्या होत्या. शिवाजी पार्कवर वाढदिवसाची सभा कदाचित छगन भुजबळ यांचीच झाली असेल, असेही यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले.