scorecardresearch

Premium

उजनी धरणात पुण्यातून पाणी सोडण्याची मागणी

पुणे जिल्ह्यात विना वापर शिल्लक असलेले पाणी उजनी धरणात सोडावे, अशी मागणी खासदार मोहिते-पाटील यांनी शासनाकडे केली आहे.

उजनी धरणात पुण्यातून पाणी सोडण्याची मागणी

पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड, चासकमान आणि कळमोडी या धरणांमध्ये विनावापर पडून राहिलेले पाणी सोलापूरच्या उजनी धरणात सोडावे आणि उजनी धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रश्नावर येत्या सोमवारी पुण्यात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत बठक आयोजित केली होती. परंतु ती स्थगित करण्यात आल्यामुळे सोलापूरच्या पाणी प्रश्नाचा तिढा इतक्यात सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.
भामा आसखेड धरणात ६.५ टीएमसी, चासकमान धरणात ४.५ टीएमसी आणि कळमोडी धरणात १.५ टीएमसी याप्रमाणे तिन्ही धरणांमध्ये मिळून १२.५ टीएमसी इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे. या पाण्याचे कोठेही वाटप नियोजन नाही. या तिन्ही धरणांना एकही कालवा नाही. उजनी धरणात हे पाणी सोडण्यासाठी मधले अंतर केवळ ३० किलोमीटर आहे.
यापूर्वी २००२ साली आपण पुण्याचे पालकमंत्री होतो, त्यावेळी इकडे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले होते. तेव्हा पुण्यातून अशाच पध्दतीने उजनी धरणात पाणी सोडण्यात आले होते. त्याच पध्दतीने आतादेखील पुणे जिल्ह्यात विना वापर शिल्लक असलेले पाणी उजनी धरणात सोडावे, अशी मागणी खासदार मोहिते-पाटील यांनी शासनाकडे केली आहे. उजनी धरणात सध्या उणे साडेसहा टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असून तो ठेवला गेला आहे. उजनी धरणाच्या वर १९ धरणे आहेत.यात उजनी धरण हे शेवटच्या टोकाला आहे. पुण्याहून या धरणात पाणी सोडल्यास आणि नंतर लगेचच उजनीतून उजव्या व डाव्या कालव्यातून तसेच भीमा-सीना बोगद्यातून पाण्याचे दोन आवर्तने निघू शकतात. उजनी धरणाच्या सिंचन क्षेत्रात दोन लाख एकर शेती आहे.

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-08-2015 at 03:30 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×