राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मराठा आरक्षणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्र जळतोय, आंदोलक आत्महत्या करत आहेत. पण, एक उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. तर, दुसरे उपमुख्यमंत्री व्याधीग्रस्त आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकाकी पडले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची सरकारची इच्छा नाही, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

एकनाथ खडसे म्हणाले, “विरोधी पक्षात असताना फडणवीसांनी म्हटलं होतं की, ‘सत्तेत आल्यास मराठ्यांना आरक्षण देणार. आरक्षण नाही दिलं, तर राजकीय संन्यास घेईन.’ पण, सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं. सरकार मराठा आरक्षणाबाबत उदासीन आहे.”

Maharashtra Government to Establish Jain Development Corporation, Announces Chief Minister Eknath Shinde, Maharashtra Government, Jain Development Corporation, Eknath shinde, jain samaj, jain people, jain samaj in Maharashtra, jain samaj Jain Development Corporation, jain mahasangh news, Kolhapur news, cm ekanath shinde news,
जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Sharad Pawar criticism that Narendra Modi has no moral right to demand the power of the country again
नरेंद्र मोदींना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल
uddhav thackeray criticized pm narendra modi
“काश्मीर ते मणिपूरपर्यंत खदखद अन् हिंसाचार, तरीही भारतीय नीरोचे…”; ‘त्या’ दाव्यावरून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका!
Prime Minister Modi criticism in Kanhan meeting that India is anti development
‘इंडिया’ विकासविरोधी! कन्हानच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र

हेही वाचा : “मराठा कोण आहेत? पाकिस्तान की अमेरिकेतील? त्यांचा…”, बच्चू कडूंचा सरकारला थेट सवाल; म्हणाले…

“महाराष्ट्र जळतोय, मराठा आंदोलक आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण, एक उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. तर, दुसरे उपमुख्यमंत्री व्याधीग्रस्त आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकाके पडल्यासारखं दिसत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी सरकारची प्रामाणिक इच्छा नाही,” अशी टीका एकनाथ खडसेंनी केली.

हेही वाचा : “मराठ्यांनी ठरवलं तर पाच मिनिटांत फडणवीसांचा आवाज…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

“मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, तर मंत्रिमंडळ प्रस्ताव करून विधानसभेत मंजूर करावा. नंतर केंद्र सरकारनं घटनेत बदल करून मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण द्यावं,” अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली.