शेतकऱयांकडे मोबाईलचं बील भरायला पैसे असतात, मग ते वीजेचं बील का भरत नाहीत? असा खोचक सवाल राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसेंच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत कारण, सत्तेत येण्याआधी विरोधी पक्षनेते असणारे हेच एकनाथ खडसे शेतकऱयांना वीज बील माफ करा अशी मागणी करत होते मात्र सत्तेत आल्यानंतरच्या या वक्तव्यामुळे त्यांचा सूर बदलल्याचे दिसून आले. अकोल्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मोबाईलचं कनेक्शन तुटू नये म्हणून तुम्ही जर हजार रुपयांचे बील भरता मग, वीजबील का भरत नाही असा सवाल त्यांनी शेतकऱयांना विचारला. शेतकऱयांकडे पैसे नाहीत हे आपल्याला पटत नाही. फारतर वीजबिलात सवलत देऊ, पण ते माफ करणार नाही, असेही खडसे पुढे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse slams farmers over electricity bill
First published on: 24-11-2014 at 01:47 IST