सोलापूर : आपल्या देशातील सभ्यता, संस्कृती, बंधुभाव आणि सामाजिक एकोपा जाणीवपूर्वक नष्ट केला जात आहे. शाळा -महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यास बंदी यातूनच घातली जाते, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे नेते, आमदार अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या वैचारिक पाया सोडून दिल्याची टीका आझमी यांनी या वेळी केली. सोलापुरात शनिवारी आमदार आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी भाजप व संघ परिवारावर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप व संघ परिवाराने हिंदुत्ववादाच्या नावाखाली धार्मिक ध्रुवीकरण चालविले असताना दुसरीकडे बहुसंख्य हिंदु तरुणांना बेकारीच्या खाईत लोटले जात आहे. चुकीच्या आणि आत्मघातकी निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत आहे, असा आरोप त्यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2022 रोजी प्रकाशित
हिजाब बंदीतून देशातील बंधुभाव नष्ट – अबू आझमी
आपल्या देशातील सभ्यता, संस्कृती, बंधुभाव आणि सामाजिक एकोपा जाणीवपूर्वक नष्ट केला जात आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-07-2022 at 00:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hijab ban destroys country abu azmi civilization culture social harmony ysh