मुंबईहून नाशिककडे भरधाव निघालेल्या इनोव्हाने शहापूरजवळ रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या लोकांना चिरडले. यात ४ ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर शनिवारी सकाळच्या सुमारास झाला. अपघात इतका भीषण होता की, यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक माहिती अशी, मुंबईहून नाशिककडे निघालेल्या इनोव्हा चालकाचे शहापूरजवळ आल्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटले. चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर इनोव्हा खोल खड्ड्यात जाऊन आदळली. यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. यात इनोव्हा चालकाचाही समावेश आहे. अपघातानंतर त्वरीत मदतकार्य सुरु करण्यात आले. पोलीसही घटनास्थळी धावले. जखमींवर ठाणे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Innova crushed road side people 4 dead 2 injured near shahapur mumbai agra highway
First published on: 17-11-2018 at 10:16 IST