राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर अजित पवार गटातील नेते प्रफुल पटेल यांनी २००४ मध्येच राष्ट्रवादीची भाजपा आणि शिवसेनेबरोबर युती होणार होती, असा गंभीर आरोप केला. तसेच प्रमोद महाजन यांना त्यांचं दिल्लीतील महत्त्व कमी होईल अस वाटल्यानं ही युती नको होती, असंही नमूद केलं. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. आता शरद पवार गटातील नेते जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (१ डिसेंबर) नाशिकमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

जयंत पाटील म्हणाले, “मी त्यावेळी लहान होतो. मला तपशील माहीत नाही.ते म्हणतात २००४ ला भाजपाबरोबर जाणार होते, पण तेव्हा ते गेले का? घटना काय घडली यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. जर शरद पवारांना भाजपाबरोबर जायचं असतं, तर ते यापूर्वीच गेले असते. ते भाजपाबरोबर गेले नाहीत ही वस्तूस्थिती आहे. त्याचं दुःख कुणाला असेल, तर माझा त्याला नाईलाज आहे.

Jitendra Awhad, amit shah, corruption,
…मग समजेल भ्रष्टाचारांचा सरदार कोण, आमदार जितेंद्र आव्हाड यांची शहांवर टीका
RSS linked weekly Vivek blames BJP poor Maharashtra Lok Sabha show on NCP tie up
“राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची युती भोवली”; संघाच्या ‘विवेक’ साप्ताहिकाने भाजपाला विचारले बोचरे प्रश्न
cm eknath shinde
भारतीय संघाला दिलेल्या ११ कोटी रुपयांच्या बक्षिसावरून विरोधकांची टीका; CM शिंदेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, “कसाबला…”
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
Sanjay Raut on Pm Narendra Modi Speech
‘बालबुद्धीच्या नेत्यानेच मोदींना घाम फोडला’, संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका
Sanjay Raut on Ambadas Danve
“भाजपाच्या टोळ्यांना त्याच पद्धतीने…”, विधानपरिषदेतल्या राड्यानंतर संजय राऊतांकडून अंबादास दानवेंची पाठराखण
Rahul Gandhi criticizes Prime Minister Narendra Modi government policies BJP
लोकसभेत धुमश्चक्री; राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Kangana Ranuat and Ravi kishan slams rahul gandhi
“राहुल गांधींचे भाषण म्हणजे स्टँडअप कॉमेडी…”, खासदार कंगना रणौत, रवि किशन यांची टीका

“चिंतन शिबिरात चिंतन करायचं असतं. चिंतनात ते काही बोलले असतील. मला तपशिलात ते काय बोलले माहिती नाही. त्याबाबत काही मत व्यक्त करायचं असेल, तर ते पूर्ण काय बोलले ते ऐकूनच मी बोलेन,” असंही जयंत पाटलांनी नमूद केलं.

प्रफुल पटेल नेमकं काय म्हणाले होते?

प्रफुल्ल पटेल म्हणाले, “आपली भाजपा आणि शिवसेनेबरोबर २००४ लाच युती होणार होती. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हा जन्माला आला होता. त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांचा १६-१६-१६ असा फॉर्म्युलादेखील ठरला होता. भाजपा-शिवसेनेबरोबर युतीत लोकसभा निवडणूक लढायची आणि सरकारमध्ये सामील व्हायचं असं ठरलं होतं. यासाठी माझ्या दिल्लीतल्या घरात दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्यासह भाजपा आणि राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यांची चर्चा झाली होती. ही चर्चा आपण कोणाच्या सांगण्यावरून केली माहितीय का? अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंह या तिघांच्या सूचनेप्रमाणे बैठक झाली.”

हेही वाचा : “२०१४ मध्ये राष्ट्रवादीनं माझं सरकार पाडलं”, चव्हाणांच्या विधानाला प्रत्युत्तर देत प्रफुल्ल पटेल म्हणाले…

“माझ्या घरी झालेल्या बैठकीनंतर दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे खुश होते. परंतु, त्यांना या सगळ्या घडामोडींमध्ये फारसं सहभागी करून घेतलं नव्हतं. दुसऱ्या बाजूला प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. कारण त्यांना वाटत होतं की या युतीमुळे त्यांचं दिल्लीतलं महत्त्व कमी होईल. महाजन यांना वाटत होतं की, आज मी दिल्लीत महाराष्ट्रातला निर्विवादपणे मोठा नेता आहे. परंतु, शरद पवार आपल्याबरोबर आले तर आपले दिल्लीतले पक्षश्रेष्ठी पवारांचंच जास्त ऐकतील. त्यामुळे प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांना बैठकीची बातमी सांगितली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर, शरद पवारांवर आडवी तिडवी टीका केली आणि २००४ ला भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीची होणारी युती फिस्कटली. हे कोणालाही माहिती नसेल. हे मी आज पहिल्यांदाच जाहीरपणे सांगतोय,” असंही पटेल यांनी नमूद केलं.