Kiran Mane Post : प्रसिद्ध अभिनेते आणि ठाकरे गटाचे समर्थक किरण माने यांनी जातीधर्मावरून सत्ताधारी पक्षाला खडेबोल सुनावले आहेत. “द्वेष करायचाच असेल तर कुठल्या जातीधर्माचा नव्हे, तर माणसामाणसात भेदभाव करणार्या कारस्थानी आणि कपटी ‘वृत्ती’चा करा”, अस त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सुरू झालेल्या राजकारणावर त्यांनी भाष्य केलं आहे.
किरण माने म्हणाले की, “उदाहरणार्थ… बदलापूर बलात्कार प्रकरणात फरारी असलेला संस्थाचालक – तुषार आपटे. सोशल मीडियावर एका बाईच्या जाळ्यात अडकून आपल्या देशाची संरक्षणविषयक अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानला देणारा देशद्रोही – प्रदीप कुरूलकर. देशातल्या बँकिंग इतिहासातला सगळ्यात मोठा चौदा हजार कोटीचा चुना लावून पळून गेलेला चोर – नीरव मोदी. तीन हजार महिलांवर बलात्कार करून परदेशात मजा मारत बसलेला सत्ताधारी पक्षाचा नेता – प्रज्वल रेवण्णा. शिवछत्रपतींच्या पुतळ्यातल्या भ्रष्टाचारात सामील होऊन पुतळा कोसळल्यावर लपून बसलेला मूर्तिकार – जयदीप आपटे. बंगालमधील कोलकाता रेप मर्डर केसमधला आरोपी – संजय राॅय. …आणि आपल्या देशाला आणि महिलांना धोका वगैरे आहे म्हणे ‘मुसलमानां’पासून!”
“हे काय आहे माहितीये? कृष्णा कुलकर्ण्यासारख्याने गद्दारी करून वार केला की ‘वितभर पोटासाठी’ आणि अफजलखानासारख्या हराम्यानं बगलेत दाबलं की ‘तो मुस्लिम होता म्हणून.’ असा बुद्धीभेद करणं आहे. नीच नराधमांना जातधर्म नसतो! अफजलखान असो वा कृष्णा… औरंग्या असो वा अनाजी… हे सगळे ‘रयतेला’ म्हणजेच कष्टकरी बहुजनांना झुकतं माप देणार्या शिवरायांच्या स्वप्नातल्या स्वराज्याचे दुश्मन होते”, असं किरण माने म्हणाले.
उदाहरणार्थ…
बदलापूर बलात्कार प्रकरणात फरारी असलेला संस्थाचालक – तुषार आपटे.
सोशल मिडीयावर एका बाईच्या जाळ्यात अडकून आपल्या देशाची संरक्षणविषयक अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानला देणारा देशद्रोही – प्रदीप कुरूलकर.
देशातल्या बॅंकिंग इतिहासातला सगळ्यात मोठा चौदा हजार करोडचा चुना… pic.twitter.com/9AqTddsj23This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Kiran Mane (@kiranmane7777) September 3, 2024
“छत्रपतींनी कधीही जातधर्मावरून भेद केला नाही. त्यांचा खोटा जयजयकार करत धर्मद्वेष पसरवणारी ही जी गद्दार पिलावळ आहे, त्यांना या देशातल्या सर्वसामान्य रयतेला गुलाम बनवायचं आहे. या खरंतर छ. शिवरायांच्या शत्रूंच्याच अवलादी आहेत. …म्हणून भावांनो, छत्रपतींना मानता ना? मग द्वेष करायचाच असेल तर कुठल्या जातीधर्माचा नव्हे, तर माणसामाणसात भेदभाव करणार्या कारस्थानी आणि कपटी ‘वृत्ती’चा करा”, असा सल्ला किरण माने यांनी दिला.