तप्त उन्हाने घायाळ झालेल्या कोल्हापूर जिल्ह्याला शनिवारी सायंकाळी आलेल्या पावसाने हलक्या गारव्याचा दिलासा दिला. आजरा तालुक्यात गारपीट झाली. जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाल्याचे वृत्त आहे. पावसाला सुरुवात होताच अनेक ठिकाणी वीज गायब झाली.
गेले दोन दिवस जिल्ह्यात उष्मा लहर आहे. ४२ अंशापर्यंत पारा चढला होता. दुपारच्या वेळी तर बाहेर पडणेही मुश्कील झाले होते. सायंकाळी जोरदार वारे वाहू लागले, वीज चमकू लागल्या. पाठोपाठ पावसाने हजेरी लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजरा तालुक्यात आजरा शहरासह परिसारातील गावामध्ये वारा व गारांचा मोठा पाऊस पडला दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान जोराचा वारा वाहू लागला. गारांचा जोरदार वर्षाव झाला. त्याचा फटका आंबा पिकाला बसला असल्याचे सांगण्यात येते.आजरा गडहिग्लज रोडवर रत्यावर दोन ठिकाणी झाडे पडली. काही काळ वहातुक ठप्प झाली होती. आजरा शहरात अनेक घरावरचे पत्रे, कौल उडुन गेली. तर शहरात प्रमुख रत्यावर पाणीच – पाणी झाले होते. संभाजी चौक येथे शहरातुन येणारे पाणी साचले होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur rain news
First published on: 27-04-2019 at 21:52 IST