वाई: पुढच्या दहा वर्षात १२० रुपयाला गॅस व प्रति किमी ७० पैसे लिटर गाडी चालली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून भाजपने आगामी काळात हा संकल्प आखला असल्याचे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताऱ्यातील बावधन येथे केले.
भाजप पक्षाच्या मेरी माटी मेरा देश कार्यक्रमा अंतर्गत ते सातारा दौऱ्यावर आहेत. बावधन (ता वाई)येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार अमर साबळे, आ. जयकुमार गोरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी आ. मदन भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अमर साबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले, सातारा जिल्हा प्रभारी अतुल भोसले, सातारा जिल्हा सरचिटणीस सचिन घाडगे, वाई तालुका अध्यक्ष रोहिदास पिसाळ, श्रीमती विजयाताई भोसले, दीपक ननावरे, . मनीषा घैसास, चंद्रकांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा >>> “शिंदे गट आमच्याआधी सरकारमध्ये गेला, त्यामुळे…”, पालकमंत्रीपदाबाबत छगन भुजबळांचं विधान चर्चेत!
मोदीजींचा पुढच्या दहा वर्षात एकच संकल्प आहे देशात प्रत्येकाला १२० रुपयाला सिलेंडरचा गॅस मिळाला पाहिजे व ७० पैसे लिटर गाडी चालली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून भाजपने आगामी काळात हा संकल्प आखला आहे त्यामुळे चारशे रुपयात १०० किमी गाडी धावली पाहिजे असा काळ येत्या दहा वर्षात भाजप प्रत्येकाला दाखवणार आहे असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दौऱ्यात सांगितले.
बायो क्यूएल आत्मनिर्भर भारत कार्यक्रमा अंतर्गत हा बदल होणे शक्य आहे. म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी लोकसभा व विधानसभा व स्थानिक निवडणुकीतून जनतेने मतदान करावे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
बावनकुळे म्हणाले, गेल्या ९ वर्षात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृह मंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विकासाचा झंजावत सूरु असून सामान्य जनतेच्या हितासाठी. राबविलेल्या आहेत. तसेच देशातील महिलांना संसदेत प्रतिनिधित्व करता यावे यासाठी ३३टक्के आरक्षण देऊन त्यांचा सन्मान केला आहे. त्यामुळे १९१ महिलांना खासदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. तर् १०० महिला आमदार म्हुणुन निवडून येणार आहेत. जागतिक पातळीवर नरेंद्र मोदी यांनी देशाचे नाव उज्वल त्र केले आहेच परंतु १४ देशांनी आपला सर्वोच पुरस्कार देऊन मोदींना सन्मानित केले आहे. तसेच ७८ टक्के भारतीय हे पंतप्रधान म्हणून नरेंदा मोदी यांनाच पसंती देतात. मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली वाई तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.
हेही वाचा >>> कारखान्यावरील कारवाईवर रोहित पवारांची खळबळजनक पोस्ट; म्हणाले, “एका नेत्याबद्दल अंदाज योग्य होता, पण…”
यावेळी डॉ. सुरभी भोसले, माजी आ. मदन भोसले, दीपक ननावरे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारभी बावधन येथे जंगी स्वागत करण्यात आले. सजविलेल्या बैलगाडीतून मान्यवरांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काही जाबं ग्रामस्थांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. दीपक ननावरे यांनी प्रास्ताविक केले. सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले. संदीप पिसाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते.यानंतर सातारा शहरातही त्यांचे मोठे स्वागत करण्यात आले.