Mumbai News Updates, 23 November 2022 : सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. मात्र, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नसताना आता कर्नाटक सरकारने थेट सांगलीतल्या जत तालुक्यामधली ४० गावांवर दावा सांगण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हा विषय दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Central Government, Allows Export of White Onion from Gujarat, two thousand Tonnes of White Onion, Maharashtra Farmers Express Displeasure, central government White Onion from Gujarat, marathi news, maharashtra farmers,
गुजरातमधून पांढरा कांदानिर्यातीला परवानगी हा महाष्ट्रावर अन्याय; शेतकरी संघटनेचा आरोप
MLA Jitendra Awhad alleges that administration is being used for political gain in the state
राज्यात प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Satej Patil criticize Sanjay Mandlik says MPs do not meet even for a simple letter
साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
ncert book latest news
बाबरी मशीद, गुजरात दंगली, हिंदुत्वाचे संदर्भ हटवले; NCERT च्या पुस्तकामधील मजकुरात बदल!
Live Updates

Maharashtra News Live, 23 November 2022 : रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवा; खासदार सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

19:11 (IST) 23 Nov 2022
नाशिक: आधारतीर्थ आश्रमातील मुलांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह; बालकाच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून चौकशीसत्र

त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील चार वर्षाच्या बालकाच्या संशयास्पद मृ़त्यूमुळे आश्रमाच्या कामकाजासह विद्यार्थी सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकारानंतर आश्रमातील बालके घाबरली असून प्रचंड दबावाखाली आहेत. पोलीस विभागही याविषयी बोलण्यास तयार नाही.

सविस्तर वाचा

18:43 (IST) 23 Nov 2022
नवी मुंबई: स्वच्छ भारत अभियानात बक्षीस पटकावणाऱ्या नवी मुंबईत अस्वच्छता

नवी मुंबई बसणाऱ्या सिडकोच्या सीबीडी येथील मुख्य कार्यालय आवारातच मोठ्या प्रमाणात राडा रोडा अनेक महिन्यापासून पडून आहे. आपणच वसवलेल्या शहराची स्वच्छते कडे सिडकोचे कानाडोळा करीत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. सिडको आवारात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील प्रवेश द्वाराच्या डाव्या बाजूला हा राडा रोडा अनेक महिन्यापासून पडला असून राडा रोडा ज्या गोंयांत ठेवण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

18:36 (IST) 23 Nov 2022
गुवाहाटीला जाणार का? या प्रश्नावर CM शिंदेंनी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर देत पत्रकारांनाच केला प्रतिप्रश्न; म्हणाले, “कामाख्या देवीला…”

जून महिन्यामध्ये राज्यात झालेल्या नाट्यमय सत्तांतरणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या गुवाहाटीला शिंदे गट पुन्हा जाणार असल्याच्या वृत्तावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिक्कामोर्तब केलं. शिर्डीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शिंदेंनी आम्ही गुवाहाटीला जाणार असल्याचं सांगितलं. मात्र त्यांनी नेमका हा दौरा कधी आयोजित केला जाणार आहे, यामध्ये शिंदे गटातील सर्व आमदार जाणार का यासंदर्भातील सविस्तर माहिती शिंदेंनी दिलेली नाही. वाचा सविस्तर बातमी...

17:42 (IST) 23 Nov 2022
Shraddha Murder Case : मग महाराष्ट्राचं तत्कालीन सरकार आणि पोलीस या सगळ्यावर थंड का? – आशिष शेलार

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. यामुळे या प्रकरणाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. आता ‘माझ्या जीवाला आफताबपासून धोका आहे. तो माझी हत्या करून करू शकतो. अशी लेखी तक्रार श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. यावरून आशिष शेलारांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर टीका केली आहे. वाचा सविस्तर बातमी...

17:20 (IST) 23 Nov 2022
नितीश कुमार यांच्याशी कोणत्या विषयांवर चर्चा? आदित्य ठाकरेंनी दिली माहिती, म्हणाले "आगामी काळात..."

आदित्य ठाकरे आज (२३ नोव्हेंबर) बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. आदित्य ठाकरेंनी थेट बिहरला जाऊन या नेत्यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली असावी. भेटीचे नेमके कारण काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. दरम्यान, या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत, या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. ही भेट राजकीय नव्हती, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. वाचा सविस्तर

17:17 (IST) 23 Nov 2022
भिवंडीत कोट्यवधी रुपयांचा पानमसाला आणि तंबाखूचा साठा जप्त

भिवंडी येथील अंबाडी-भिवंडी रोडवर अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे विभागाने कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू आणि पानमसाला जप्त केला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

16:53 (IST) 23 Nov 2022
नाशिक: बिथरलेल्या जमावासमोर बिबट्याही झाला हतबल

शहर परिसरात बिबट्यांचा संचार नवीन नसला तरी मानवी वसाहतीत अनाहुतपणे आलेल्या या पाहुण्यासमोर अनेकांनी हिंस्त्र स्वरुपाचे दर्शन घडविले. वडाळा नाका भागातील आयेशानगरात शिरलेल्या बिबट्याला बघायला हजारोंचा जमाव जमला. वन विभागाच्या पथकाने बेशुध्दीचे इंजेक्शन डागल्यानंतर शेकडो जण लाठ्या-काठ्या घेऊन त्याच्यावर धावून गेले. बातमी वाचा सविस्तर...

16:48 (IST) 23 Nov 2022
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती स्थिर

पुणे : समर्थ अभिनयाने रंगभूमी आणि रुपेरी पडदा गाजवून रसिकांवर अधिराज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

16:22 (IST) 23 Nov 2022
“महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाला पंडित नेहरूच जबाबदार”; सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्य पुर्नरचना…”

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना या सीमा वादाला पंडित नेहरुच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. हा सीमा प्रश्न पंडित नेहरुंमुळे उद्भवला असून त्यांनी केलेली चूक कर्नाटकच्या सीमेवरील मराठी माणसाला भोगावी लागते आहे, असे ते म्हणाले. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

15:20 (IST) 23 Nov 2022
विदर्भ ही मुख कर्करोगाची राजधानी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने मुख कर्करोगाचे रुग्ण वाढत आहे. त्यांच्यावर वेळीच उपचारासह या आजारावर नियंत्रणासाठी शासन सर्वसमावेशक धोरण तयार करेल. त्यासाठी निधीही दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बातमी वाचा सविस्तर...

14:37 (IST) 23 Nov 2022
मुंबई: दिघा स्थानक वर्ष अखेरीस पूर्ण होणार

ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-ऐरोली स्थानकादरम्यान दिघा स्थानकाचे काम या वर्षा अखेरीस पूर्ण होणार असल्याची माहिती एमआरव्हिसीकडून (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) देण्यात आली आहे. त्यानंतर प्रवाशांना आणखी एक नवीन स्थानक उपलब्ध होणार आहे.

सविस्तर वाचा

14:33 (IST) 23 Nov 2022
Shraddha Murder Case : श्रद्धाच्या ‘त्या’ अर्जावर पोलिसांनी केली २६ दिवस चौकशी, श्रद्धाने अर्ज मागे घेतल्याचा पोलिसांचा दावा

वसई : ‘माझ्या जीवाला आफताबपासून धोका आहे. तो माझी हत्या करून करू शकतो अशी लेखी तक्रार श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रार अर्जावर पोलिसांनी २६ दिवस चौकशी केली होती. मात्र आफताब आणि श्रद्धा यांनी आपापसात समझोता केल्याने हा तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली.

सविस्तर वाचा...

14:00 (IST) 23 Nov 2022
उसाला एफआरपी न दिल्याने ठाकरे गटाकडून सोलापुरात आमरण उपोषण

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील तडवळच्या व्हि.पी. शुगर्सने शेतकऱ्यांना एफआरपी न दिल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून कारखान्यासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. याला शेतकरी आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. जोपर्यंत कारखाना उसाचा दर जाहीर करत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

13:52 (IST) 23 Nov 2022
शौचालयांची दुरावस्था: क्षेत्रीय कार्यालयाबाहेर शौचालयास बसून नागरिकांचे प्रतिकात्मक आंदोलन

पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीमधील शौचालयाच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त असून ही समस्या मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. ही मागणी मार्गी लावावी यासाठी पतित पावन कामगार महासंघाकडून बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. बातमी वाचा सविस्तर...

13:47 (IST) 23 Nov 2022
‘I Have Got News’, श्रद्धाचं शेवटचं चॅट आलं समोर, मृत्यूच्या काही तास आधीच मित्राला पाठवला होता मेसेज

श्रद्धा वालकरने हत्येच्या आधी केलेलं संभाषण समोर आलं आहे. १८ मे रोजी म्हणजेच मृत्यूच्या काही तास आधी श्रद्धाने हा संवाद साधला होता. श्रद्धाने दुपारी ४ वाजून ३४ मिनिटांनी आपल्या एका मित्राला मेसेज पाठवला होता. पण हा आपला शेवटचा मेसेज असेल याची श्रद्धाला कल्पनाही नव्हती.

सविस्तर बातमी

13:47 (IST) 23 Nov 2022
नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, बेलापूर – अलिबाग आता केवळ सव्वा तासात

नवी मुंबईकरांसाठी मुंबई सागरी मंडळाने वॉटर टॅक्सीची नवी सेवा सुरू केली आहे. नवी मुंबईकरांना अलिबागला केवळ सव्वातासात पोहचता यावे यासाठी बेलापूर – मांडवा वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. शनिवारपासून या सेवेला सुरुवात होणार असून या वॉटर टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तिकिटापोटी ३०० आणि ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र ही सेवा केवळ शनिवार आणि रविवारसाठीच असणार आहे.

सविस्तर वाचा...

13:33 (IST) 23 Nov 2022
कर्नाटक सरकार सांगलीतील ४० गावांवर दावा करण्याच्या तयारीत, संजय राऊत संतापले, म्हणाले “शिंदे सरकारमुळे राजकीय दरेडोखोरांना…”

कर्नाटक सरकारने सांगलीतील जत तालुक्यामधील ४० गावांवर दावा सांगण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता राज्यात वातावारण तापलं असून राजकीय नेते व्यक्त होत आहेत. खासदार संजय राऊत यांनीही संताप व्यक्त केला असून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात अत्यंत दुबळं, हतबल सरकार असल्यानेच महाराष्ट्र-कर्नाटक वाद निर्माण होत आहे. महाराष्ट्रात जे सरकार आलं आहे त्यामुळे अनेक राजकीय दरोडेखोरांना आपण महाराष्ट्राचे लचके तोडू शकतो असं वाटत आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

सविस्तर बातमी

13:15 (IST) 23 Nov 2022
सावरकरांबद्दलच्या वक्तव्यानंतरही नांदेडमधील सत्ताधारी खासदार आमदारांमध्ये शुकशुकाट

नांदेड : काँग्रेसचे युवानेते खा. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्याविरुद्ध केलेल्या अवमानकारक वक्तव्याचे पडसाद राज्यासह देशभरात उमटले असून भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट आणि मनसेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी विविध शहरांमध्ये जोरदार आंदोलन केले. मात्र नांदेडमध्ये या पक्षांनी आंदोलन तर सोडा, साधा खा.गांधी यांच्या वक्तव्याचा निषेधही केला नाही. बातमी वाचा सविस्तर...

13:05 (IST) 23 Nov 2022
‘गद्दार, गद्दार, ५० खोके एकदम ओक्के’; विनायक राऊतांसमोर शिवसैनिकांची भावना गवळींविरोधत घोषणाबाजी

अकोला : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या (शिंदे गट) खासदार भावना गवळी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत अकोला रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री समोरा-समोर उभे ठाकले होते. बातमी वाचा सविस्तर...

12:31 (IST) 23 Nov 2022
कल्याण: प. बंगालमधील दरोडेखोराला कल्याण रेल्वे स्थानकात अटक

पश्चिम बंगाल मधील आसनसोल दुर्गापूर पोलीस ठाणे हद्दीत दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा टाकून किमती ऐवज लुटून नेला होता. या दरोडेखोरांमधील एक दरोडेखोर आसनसोल एक्सप्रेसने भिवंडी-कल्याण येथे येण्यासाठी प्रवास करत असल्याची माहिती आसनसोल पोलिसांनी कल्याण रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना दिली.

सविस्तर वाचा

12:23 (IST) 23 Nov 2022
‘भारत जोडो यात्रे’ला महाराष्ट्राचा निरोप, मध्यप्रदेशात स्वागत

निमखेडी ( जि. बुलढाणा) : जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी येथे दोन दिवसांपासून मुक्कामी असलेल्या भारत जोडो पदयात्राने आज, बुधवारी बुलढाणा जिल्ह्यासह महराष्ट्राचा निरोप घेतला. सकाळी मध्यप्रदेशच्या सिमेत दाखल होताच यात्रेचे स्वागत करण्यात आले. बातमी वाचा सविस्तर...

12:11 (IST) 23 Nov 2022
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानावर शिंदे सरकारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तो विषय आता उकरून…”

जत तालुक्यातील ४० गावांनी कर्नाटक राज्यात सामील होण्यासाठी केलेल्या ठरावावर आम्ही विचार करतो आहे, असं विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई केले असून यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. दरम्यान, शिंदे सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सरकारने सीमाभागात अनेक कामं केली आहेत. ते बघून कर्नाटकची जनता तिथल्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारेल म्हणून ही खोडी काढायचा त्यांचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. सविस्तर वाचा

12:02 (IST) 23 Nov 2022
पुण्यात रिपब्लिकन गटात अस्वस्थता?

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील युती, भाजपबरोबर मनसेची वाढत चाललेली सलगी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या रूपाने पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीची एकीकरणाची शक्यता अशा राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (आरपीआय) आठवले गटामध्ये सध्या अस्वस्थता पसरली आहे. बातमी वाचा सविस्तर...

11:47 (IST) 23 Nov 2022
येथे गर्भातच होतो बाळांचा सौदा…!; अनेक निपुत्रिक दाम्पत्यांची नागपूरकडे धाव

नागपूर : महाराष्ट्रासह अन्य राज्यात नवजात बाळ विक्री करण्यासाठी नागपूर शहर देशात कुख्यात ठरत असून आतापर्यंत ४० ते ५० नवजात बाळांची नागपुरातून परराज्यात विक्री झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बातमी वाचा सविस्तर...

11:46 (IST) 23 Nov 2022
फुटबॉलपटू कतारमध्ये ‘अशी’ बंडखोरी करतात तेव्हा…

कतारमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल सामन्यातल्या दोन घटनांविषयी आजच्या बातम्या लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. इराणच्या फुटबॉलपटूंनी आपल्या देशाचं राष्ट्रगीत गायला नकार दिला- त्याऐवजी हे सारे पुरुष फुटबॉलपटू फक्त उभे राहिले- ही पहिली गोष्ट. सप्टेंबर महिन्यात महासा अमिनी या बावीस वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाल्यावर स्त्रियांच्या हिजाबच्या सक्तीच्या मुद्द्यावरून इराणमध्ये मोठा संघर्ष सुरू झाला. बातमी वाचा सविस्तर...

11:46 (IST) 23 Nov 2022
नाशिक: आधारतीर्थ आश्रमातील चिमुकल्याची गळा दाबून हत्या

त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील चार वर्षाच्या बालकाची गळा दाबून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी समोर आला. या चिमुकल्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे आधारतीर्थ आश्रमाच्या कामकाजासह,बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. बातमी वाचा सविस्तर...

11:44 (IST) 23 Nov 2022
डॉ. राहुल पाटील : रचनात्मक कार्यातून राजकारण

परभणी: आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणार अशी ग्वाही दिल्यानंतरही एक-एक आमदार सोडून जात असताना परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील हे मात्र अविचल राहिले. ‘मातोश्री’शी असलेली निष्ठा त्यांनी जराही ढळू दिली नाही म्हणूनच परभणीत शिवसेना अभेद्य राहिली. बातमी वाचा सविस्तर...

11:44 (IST) 23 Nov 2022
Nagpur University: निवडणूक मतमोजणी केंद्रावर दोन प्राचार्यांमध्ये मध्यरात्री राडा; कारण…

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा, विद्वत परिषद व अभ्यास मंडळाच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी दहा वाजतापासून सुरुवात झाली. यात प्राचार्य आणि व्यवस्थापन गटात विद्यापीठ शिक्षण मंचाला दणदणीत यश मिळाले. त्यामुळे प्रतिस्पर्धी महाआघाडीला धक्का बसला. बातमी वाचा सविस्तर...

11:43 (IST) 23 Nov 2022
जळगाव: धरणगाव तालुक्यातील अपघातात गटविकास अधिकारी जागीच ठार

धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ बुधवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास भीषण अपघातात शासकीय कामासाठी नाशिक येथे जात असलेले अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जागीच ठार, तर चालक जखमी झाला आहे. चौधरी यांच्याकडे यावलच्या गटविकास अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. बातमी वाचा सविस्तर...

11:42 (IST) 23 Nov 2022
वाघाच्या डरकाळ्यांमुळे गोंदियातील नवेझरीत अघोषित संचारबंदी; ग्रामस्थांमध्ये दहशत

तिरोडा तालुक्यातील जंगलव्याप्त नवेझरी गावात सध्या वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. गावाला लागून व्याघ्रप्रकल्प असल्यामुळे तेथील वन्यजीव गावाशेजारी नेहमीच येत असतात. गेल्या काही दिवसांपासून शेतशिवारात वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असून अनेकांना वाघ दिसल्याचेही बोलले जात आहे. बातमी वाचा सविस्तर...

11:41 (IST) 23 Nov 2022
जळगाव: सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना वैधमापनशास्त्रचा निरीक्षक अटकेत

जामनेर तालुक्यातील पहूर येथे पेट्रोलपंपासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी सहा हजारांची मागणी करणार्‍या पाचोरा येथील वैधमापनशास्त्र विभागाच्या लाचखोर निरीक्षकाला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत रंगेहाथ अटक केली, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी दिली. बातमी वाचा सविस्तर...

11:40 (IST) 23 Nov 2022
Shraddha Murder Case : दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने आफताबाबत व्यक्त केली होती ‘ही’ भिती

विरार : आफताब दररोज मला मारहाण करत असून तो माझी हत्या करून माझ्या शरीराचे तुकडे करून फेकून देईल अशी लेखी तक्रार श्रद्धाने २३ नोव्हेंबर २०२० रोजी नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. बातमी वाचा सविस्तर...

11:38 (IST) 23 Nov 2022
जळगाव, पालघर, ठाणे शहरांमध्ये वाहने चोरणारा सराईत चोरटा अटक

ठाणे, पालघर, जळगाव जिल्ह्यांच्या हद्दीत वाहने चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला टिटवाळा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून चारचाकी, दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. त्याच्यावर पालघर, ठाणे, जळगाव जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सविस्तर वाचा

11:22 (IST) 23 Nov 2022
आत्महत्या, बलात्कार आणि खूनाचे गंभीर आरोप, आता सीबीआयने सांगितलं दिशा सालियनच्या मृत्यूचं नेमकं कारण

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा वाढवला होता. या प्रकरणात भाजपा मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले. राणेंनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरही आरोप केले. मात्र, आता या प्रकरणा सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. सीबीआयने सादर केलेल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे दिशाची आत्महत्या झाल्याचा, बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे आरोप खोटे ठरले आहेत.

सविस्तर बातमी...

11:07 (IST) 23 Nov 2022
“ही केवळ लाचारी”, आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावरुन नरेश म्हस्केंचं टीकास्र; म्हणाले, “ज्यांनी बाळासाहेबांना…”

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे आज एकदिवसीय बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावरुन शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टीका केली आहे. “ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, ज्यांच्या विरोधात बाळासाहेब होते, त्यांना जाऊन आदित्य ठाकरे भेटत आहेत. त्यांच्यावर ही काय वेळ आली आहे… ही केवळ लाचारी आहे”, अशा शब्दात म्हस्केंनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा समाचार घेतला.

सविस्तर बातमी वाचा...

11:04 (IST) 23 Nov 2022
Elon Musk: ट्विटर संपणार म्हणणाऱ्यांना एलॉन मस्क यांचा उलट सवाल; म्हणाले, “ट्विटरने आत्तापर्यंत…”

ट्विटरमधील नोकरकपात त्यानंतर कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून सुरू झालेले राजीनामासत्र पाहता ट्विटरच्या भवितव्याबाबत काही युजर्संकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. एलॉन मस्क यांनी कंपनीचा ताबा घेतल्यानंतर झालेल्या घडामोडींमुळे ही मायक्रो ब्लॉगिंग साईट टिकणार नाही, असा कयास काही युजर्सकडून बांधला जात आहे. या टीकाकारांना एलॉन मस्क यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सविस्तर बातमी वाचा...

11:03 (IST) 23 Nov 2022
Delhi Murder: दिल्लीच्या पालममध्ये एकाच कुटुंबातील चौघांची हत्या, आरोपीला अटक

दिल्लीच्या पालम भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिसरात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये दोन बहिणी, त्यांचे वडील आणि आजीचा समावेश आहे. या कुटुंबियांचे मृतदेह पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात आज सकाळी आढळून आले आहेत.

सविस्तर बातमी वाचा...

10:58 (IST) 23 Nov 2022
“…आणि आपल्या सरकारचा मात्र डोळा लागलाय”, सीमाप्रश्नावरून रोहित पवारांचं शिंदे सरकारवर टीकास्र!

जत तालुक्यामधली ४० गावांवर दावा सांगण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यावरून एकनाथ शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. सविस्तर वाचा

10:58 (IST) 23 Nov 2022
सांगलीतील ४० गावांवर कर्नाटकची नजर, बसवराज बोम्मई यांनी केले मोठे विधान!

कर्नाटक सरकार सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगण्याच्या तयारीत आहे. जतमधील ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याच ठराव केला आहे. त्यामुळे या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले आहेत. पाणी तसेच इतर प्रश्नांच्या निमित्ताने जतमधील काही गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव केला होता. याच ठरावाचा आधार घेऊन बोम्मई यांनी हा दावा केला आहे. सविस्तर वाचा

मुंबई-बेंगळुरू महामार्गावर नवले पूल परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आणि रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली.