Maharashtra Political New Live Updates, 11November 2025 : दिल्लीत झालेल्या स्फोटांवरुन नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान पार्थ पवार यांच्या प्रकरणाबाबत आणखी काही नवे अपडेट्स समोर येतात का? ते पाहणंही महत्वाचं असणार आहे. तर २ तारखेला निवडणूक होणार आहे त्याची तयारी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान काहीही झालं तरीही मनसेसह जायचं नाही असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही महापालिका आणि इतर निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. या बातमीसह महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
Mumbai Maharashtra Breaking News Live Updates Today : दिल्लीत झालेला कारचा स्फोट हे केंद्र सरकारचं अपयश, नाना पटोलेंची टीका आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी
केईएम रुग्णालयाच्या ढिसाळ कारभार, मंगलप्रभात लोढा यांनी अधिष्ठातांना धरले धारेवर
Delhi Car Blast : "दिल्ली हल्ल्यामुळे पंतप्रधान मोदींच्या आश्वासनांची पोलखोल", नाना पटोलेंची टीका; गृहमंत्री शहांवरही..
गळ्यात अडकलेला माशाचा काटा काढण्यास डॉक्टरांचा नकार, कूपरमध्ये मारहाण केल्याप्रकरणी डॉक्टरांमध्ये दहशतीचे वातावरण
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन आकर्षण वाढणार; सिंह सफारी नोव्हेंबर, तर मिनी ट्रेन डिसेंबरपर्यंत सुरू होणार
दिल्ली स्फोटांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांच्या सुरक्षेत वाढ
दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील गर्दीच्या ठिकाण असलेल्या अनेक देवस्थानांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या गजानन महाराजांच्या शेगाव मंदिर परिसरातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रात्रीपासूनच कुठलाच गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेसह शेगाव मंदिर सुरक्षा रक्षक अलर्ट मोडवर आले आहेत. प्रत्येक येणाऱ्या भाविकांची या ठिकाणी कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत. त्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणा खबरदारी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळासंख्येत घट… अन्य माध्यमाच्या शाळा घसरणीला; इंग्रजी माध्यमाच्या शाळांत मात्र वाढ
मुंबई : विविध कारणांमुळे महानगरपालिकेच्या शाळा बंद पडण्याचे सत्र सुरूच असून न्यू माहीम शाळेच्या मुद्द्यामुळे बंद शाळांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबईत गेल्या तीन वर्षात विविध माध्यमांच्या २८ शाळा बंद किंवा समायोजित झाल्याचे समोर आले आहे.
दिल्लीतला स्फोट हे केंद्र सरकारचं अपयश-नाना पटोले
आम्हीच करू शकतो अशा पद्धतीने आश्वासन देऊन लोकांना मूर्ख बनवलं. आता कश्मीर असुरक्षित आहे, छप्पन इंचाची छाती आता कुठे गेली आहे? आम्हाला राजकारण करायचं नाही. दिल्लीत आणि केंद्रात सरकार यांच असताना हे दहशतवादी या ठिकाणी आले कुठून? असा प्रश्न निर्माण होत आहे.नरेंद्र मोदींनी दिलेल्या खोटे आश्वासनांची पोलखोल आता झाली आहेभ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. आम्हाला यात राजकारण करायचं नाही पण देशाच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात आम्ही तिथेच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या बॉम्बस्फोटामध्ये दहशतवादी येतात, सरकार बिहारच्या प्रचारात मग्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहे. देश सुरक्षित नाही, देशाच्या सुरक्षेची हमी घेणारे प्रधानमंत्री, गृहमंत्री कुठे लपले आहेत? या स्फोटाची जबाबदारी त्यांची आहे अशी टीकाही नाना पटोलेंनी केली आहे.
दिल्लीत झालेल्या स्फोटांवरुन नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान पार्थ पवार यांच्या प्रकरणाबाबत आणखी काही नवे अपडेट्स समोर येतात का? ते पाहणंही महत्वाचं असणार आहे. तर २ तारखेला निवडणूक होणार आहे त्याची तयारी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरु केली आहे.
