पती पत्नीच्या वादात पोटच्या मुलांना बांधून जाळून मारणाऱ्या पित्याला पोलिसांनी बुधवारी अटक केली. कुंदन सुधाकर वानखेडे असे या निर्दयी आरोपीचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील टालेवाडी या ठिकाणी २१ जूनच्या रात्री ही वडिलांनी मुलांना पेटवून ठार मारल्याची घटना घडली होती. कुंदनने त्याची दोन मुले बलभीम व वैष्णव यांना राहत्या घरी बांधून पेटवून दिले. यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. या निर्दयी कृत्यानंतर आरोपी फरार झाला. आज सुधाकर टालेवाडी येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी वडिलांनी अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजलगाव (जि. बीड) कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर आपल्या ताब्यात असणाऱ्या मुले पत्नीच्या ताब्यात मिळू नयेत, या हेतून त्याने मुलांना पेटवून मारले. निर्दयी बापाने घरातच गोवऱ्या रचून त्यावर मुलांना झोपवले व पेटवून दिले. त्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून तो पसार झाला. कुंदन सुधाकर वानखेडे आणि पत्नी रेखा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. त्यांच्यातील वाद हा न्यायालयापर्यंत पोहोचला होता. न्यायालयीन तारिख दोन दिवसांवर आली असताना त्याने मुलांना जिवंत जाळले.

 

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested child burn kill case in beed
First published on: 28-06-2017 at 17:51 IST