मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठकांवर बैठका होत आहेत. मात्र, अद्यापही त्यावर अंतिम तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी जालन्यात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी आमच्याविरोधात जे बोलतात त्यांना आम्ही सोडत नाही, असं म्हणत विरोधकांना सूचक इशाराही दिला. ते जालन्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, “आमच्याविरोधात जे बोलतात त्यांना आम्ही सोडत नाही. आपला दणका असा आहे. त्यामुळे जो बोलत नाही त्याला विनाकारण का लक्ष्य करायचं, मग तो कुणीही का असेना. मात्र, जे सत्तेत आहेत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरावा हा त्यांना आमचा संदेश आहे.”

1 lakh farmers waiting for crop insurance claim
बुलढाणा: सव्वादोन लाख शेतकऱ्यांना पिकविम्याची प्रतीक्षाच! मुख्यमंत्र्यांना साकडे
Balapur , Nitin Deshmukh, Tehsildar,
अकोला : खळबळजनक! आमदार नितीन देशमुख यांनी तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांना कोंडले
union home minister amit shah likely to kolhapur for inauguration with condition
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा बँकेची अशी ही ‘झाडा’झडती; उद्घाटनासाठी येण्याकरीता १० हजार झाडे लावण्याची सक्ती
Union Minister Nitin Gadkari Goa Speech
नितीन गडकरी यांनी टोचले भाजपा नेत्यांचे कान,”चांगले दिवस आले की आपण जुन्या काळातला संघर्ष…”
The young man direct request to Chief Minister Eknath Shinde regarding marriage
लग्नासाठी मुलगी मिळेना…तरुणाची थेट मुख्यमंत्र्यांना साद…फलकावर लिहिले, ‘लाडका भाऊ’ योजना…
rahul gandhi letter to yogi adityanath
हाथरस दुर्घटनेप्रकरणी राहुल गांधींचं योगी आदित्यनाथ यांना पत्र; म्हणाले, “उत्तर प्रदेश सरकारने…”
Criticism of Eknath Shinde government regarding Rabindra Waikar investigation closed by the ed print politics news
खासदार वायकर यांना अभय; विरोधकांची टीका; सोमय्या कुठे गेले, काँग्रेसचा सवाल
Eknath Shinde
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या महिलांबरोबर तलाठ्यांकडून अरेरावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला इशारा; म्हणाले…

“आम्ही अजित पवारांना विनंती करतो की…”

“अजित पवारांनी कमी पडलो असं म्हटलं. आता आम्ही त्यांना विनंती करतो की, त्यांनी चार-पाच पक्षांना एकत्र घेऊन हा विषय लावून धरावा. तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावं. गोरगरिबाचं कल्याण करावं. दुसरी आमची काहीही मागणी नाही. आमच्या गोरगरिबांचा आक्रोश त्यांच्या लक्षात येत असेल,” असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं.

व्हिडीओ पाहा :

“…तर तुमच्यासमोर नाक घासायला मागे पुढे पाहणार नाही”

“आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. विरोध म्हणून उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीला जाऊ नका, आमचा आक्रोश घेऊन या बैठकीला जा. मराठा समाजाला आरक्षण मिळाले, तर तुमच्यासमोर नतमस्तक होईन. तुमच्यासमोर नाक घासायला मागे पुढे पाहणार नाही. अजित पवार यांनीच सर्व पक्षीय नेते गोळा करून गरिबांच्या लेकरांना न्याय द्यावा,” असंही जरांगे पाटलांनी नमूद केलं.

हेही वाचा : सरकारच्या बंद लिफाफ्यावर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “सरकारने त्या आदेशात…”

“मुख्यमंत्र्यांवर माझा पूर्ण विश्वास”

“२००४ चा जीआर किंवा नवीन जीआर लागू करा. उद्या अनेक ठिकाणी राज्यात चक्का जाम करण्यात येणार आहे. मात्र, कुणालाही वेठीस धरू नका. उग्र आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही. मुख्यमंत्र्यांवर माझा पूर्ण विश्वास असून ते मराठा समाजाला नक्की न्याय मिळवून देतील,” असंही जरांगे यांनी सांगितलं.