गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अवधी दिली आहे. ४० दिवसांत मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, तर पुन्हा उपोषणाला बसू असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. दुसरीकडे, राज्यात जातीनिहाय जनगणनेची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

शरद पवारांच्या या मागणीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. तुम्ही जातीनिहाय जनगणना करा, नाहीतर पुरावे जमा करा, तुम्हाला जे करायचं आहे, ते करा, पण आधी मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

Sharad Pawar Reaction on saif ali khan
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
Ashish Shelar On Uddhav Thackeray
Ashish Shelar : “तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नही…”, आशिष शेलारांचा शेरोशायरीतून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…
Laxman Hake On Manoj Jarange Patil MLA Suresh Dhas
Lakshman Hake : “संतोष देशमुखांच्या हत्येच्या घटनेचं गांभीर्य…”, लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगे अन् सुरेश धसांवर हल्लाबोल

हेही वाचा- “एक अफवा सकाळी सोडायची, दुसरी अफवा संध्याकाळी सोडायची”; फडणवीसांचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

राज्यात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, या शरद पवारांच्या मागणीबाबत विचारलं असता मनोज जरांगे पाटील म्हणाले, “तुम्ही जातीनिहाय जनगणना करा, नाहीतर पुरावे जमा करा. तुम्हाला जे काय करायचं ते करा. आता मी एकदाच सगळ्या पक्षांना सांगितलं आहे की, तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात जाऊ नका. तुम्ही आता गप्प बसा. आधी आम्हाला आरक्षण द्या, मग जनगणना करा. त्यानंतर ५० टक्क्यांची मर्यादा वाढवा, नाहीतर आरक्षण ५०० टक्क्यांवर घेऊन जावा. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आधी मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आतमध्ये आरक्षण द्या.”

हेही वाचा- “महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान, नेमकं काय म्हणाले?

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

राज्यात कोणता समाज किती टक्के आहे? याबद्दलची माहिती मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कोणत्या जातीचे किती लोक आहेत, हे एकदा लोकांना कळू द्यावे. त्याचे चित्र पुढे ठेवल्यानंतर जो सगळ्यात दुबळा आहे. त्याच्यासाठी देशाची, राज्याची शक्ती वापरण्याची आज खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले होते.

Story img Loader