भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर लोटला आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट लिहून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे कान टोचले आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो शेअर करत त्यांच्या विचारांची आठवणही राज ठाकरे यांनी करून दिली आहे.

राज ठाकरे पोस्टमध्ये काय म्हणाले?

एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले, “सर्वप्रथम आजच्या महापरिनिर्वाण दिनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. इतिहासात डोकावून बघताना अगदी मोजकेच महापुरुष आढळतात की, त्यांच्यानंतरसुद्धा त्यांचे विचार तळपत राहतात आणि त्यातून बदलाच्या लाटा पुढे अनेक दशकं येत राहतात, त्यांचे विचार समाजाला प्रेरित करत राहतात.”

motor-tempo accident natepute, accident natepute
सोलापूर : नातेपुतेजवळ मोटार-टेम्पो अपघातात मायलेकासह चौघांचा मृत्यू, तिघे जखमी
Ramraje Naik Nimbalkar, Satara,
सातारा : रामराजे नाईक निंबाळकर यांनी पक्षांतराचे वृत्त…
SambhajiRaje Chhatrapati
SambhajiRaje Chhatrapati : “केंद्रात अन् राज्यात तुमचं सरकार, मग स्मारक का झालं नाही?”, संभाजीराजे छत्रपतींचा राज्य सरकारला सवाल
latur student food poisoning news
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील ५० विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा; उपचार सुरू
Ramraje Naik Nimbalkar, Ranjit Singh Naik Nimbalkar,
तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या, अपक्ष लढू; रामराजे नाईक निंबाळकरांचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आव्हान
Highway between Navi Mumbai and Bangalore with airport landing facility
नवी मुंबई ते बंगळूरू दरम्यान विमान उतरण्याची सुविधा असलेला महामार्ग; नितीन गडकरी यांची घोषणा
Guardian Minister Suresh Khade associate Mohan Wankhande in Congress
पालकमंत्री सुरेश खाडे यांचे सहकारी प्रा. मोहन वनखंडे काँग्रेसमध्ये
UNESCO team appreciated servants for preservation of Pratapgad and tradition of festivals
प्रतापगडाच्या संवर्धनाचे ‘युनेस्को’कडून कौतुक
Under CM Majhi Ladki Bahin Yojana 22 applications filed in Barshi taluka on forged documents
बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटण्याचा प्रयत्न बार्शीत २२ प्रकार उजेडात; बँक खातेही परराज्यातील

राज ठाकरेंनी पुढे लिहिलं, “महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महापुरुष या भूमीत होऊन गेले. स्वराज्याची मुहूर्तमेढ याच राज्यात रोवली. स्त्रीशिक्षणासारखं पवित्र कार्य याच राज्यात आकाराला आलं. शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या सहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित – पीडितांचे पुनरुत्थान करणारा महामानव पण याच भूमीतील. हे सगळं आजच्या दिवशी लिहिताना त्यासोबत एक फोटो इथे मुद्दामहून टाकला आहे.”

“कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र असलेला हा फोटो. तीन उत्तुंग कार्य करून गेलेली आणि एकेमकांबद्दल पराकोटीचा आदर असणारी ही माणसं. हा आपला महाराष्ट्र होता. याचा विसर आपल्याला कदाचित पडायला लागला आहे, असं वाटावं अशी परिस्थिती आहे. यातून महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा तो म्हणजे देशाला आकार देणारं, स्वभान देणारं हे राज्य आहे. याचं भान गमावू नये. उत्तर आणि दक्षिण अशा संस्कृतींना जोडणारा सांधा म्हणजे महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्राने आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा जो चिखल होऊ दिलाय, तो वेळीच थांबवावा. कारण महाराष्ट्ररूपी सांधा निखळला आणि आपणही वाहवत गेलो तर हे फक्त राज्याचं नाही तर देशाचं अपरिमित नुकसान ठरेल. आजचा महापरिनिर्वाण दिन यासाठी महत्त्वाचा आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून आपल्यातले सगळे भेद गाडून हा देश, हे राज्य पुन्हा एकसंध करण्यासाठी सगळ्यांनी शपथ घेण्याचा हा दिवस. पुन्हा एकदा महामानवाच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन,” असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं.