‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्रजी पवार’ गटाला निवडणूक आयोगाने तुतारी फुंकणाऱ्या व्यक्तीचे चिन्ह दिले आहे. शरद पवार गटाकडून या चिन्हाचे अनावरण आज रायगड किल्ल्यावरुन करण्यात आले. याबद्दल मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आज प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “तुतारी मिळाली तर फुंका आता. छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला. मी मागेही यावर बोललो आहे. फुले-शाहू-आंबेडकर नाव घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाहीत? असा प्रश्न मी त्यांना मागेही विचारला होता. छत्रपतींचं नाव घेतल्यावर मुस्लिमांची मते जातात, अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आणि आता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली.”

तुतारी चिन्हाचं रायगडावर अनावरण, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “रणशिंग फुंकायला…”

ajit pawar meets amit shah in delhi ahead of assembly polls in maharashtra
शहांच्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता?अजित पवारांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा
Eight ex Corporators of Nationalist Sharad Chandra Pawar Party in Kalwa Mumbaira join Ajit Pawar Group
कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाड यांना धक्का; आठ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश
Lok Sabha Election 2024 Seat Allocation BJP Congress Mahavikas Aghadi
महाराष्ट्रातील जागावाटपात भाजप, काँग्रेस थोरले भाऊ? मित्र पक्षांची कितपत तयारी!
sharad pawar nifad nashik
दिंडोरीच्या यशानंतर शरद पवारांची निफाडमध्ये मोर्चेबांधणी, आमदार दिलीप बनकर यांच्या अडचणीत वाढ
Anger about allies in BJP meeting  Complaints of Shiv Sena  NCP not working in Lok Sabha Mumbai
भाजपच्या बैठकीत मित्रपक्षांविषयी नाराजी; शिवसेना, राष्ट्रवादीने लोकसभेत काम न केल्याच्या तक्रारी
Thane Congress president, thane,
ठाणे काँग्रेस अध्यक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम, अफवा पसरवून गटबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे प्रदेशाध्यक्षाचे संकेत
suryakumar yadav in assembly
सूर्यकुमारचं विधीमंडळात मराठीत भाषण; आमदारांनी केला “सूर्या, सूर्या..” जयघोष
ajit pawar lead ncp workers likley to join sharad pawar group
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारीही शरद पवार गटाच्या वाटेवर? रोहित पवारांची भेट घेतली, अजित पवारांना धक्का

असं विचित्र वातावरण कधी पाहिलं नव्हतं

पुण्यात काही दिवसांपूर्वी १०० व्या नाट्य संमेलन कार्यक्रमात काही राष्ट्रवादीचे काही नगरसेवक मला भेटले, अशी एक आठवण राज ठाकरेंनी सांगितली. ते म्हणाले, “मी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विचारलं कोणत्या गटाचे? तेव्हा दोन-तीन जण म्हणाले शरद पवार गटाचे तर बाकीचे काही जण म्हणाले अजित पवार गटातून आहोत. असे विचित्र वातावरण महाराष्ट्राने कधीही पाहिले नव्हते. जनतेनेच या लोकांना वठणीवर आणले पाहीजे. लोकांनी जर यांना वठणीवर आणले नाही, तर महाराष्ट्राचा अजून चिखल होत राहिल.”

“त्या हल्ल्याला राजकीय झालर”, गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य; रोख कोणाकडे?

“महाराष्ट्राचे जुने दिवस आणायचे असतील तर जनतेनं याचं भान ठेवलं पाहीजे. केंद्रात पंतप्रधान मोदी यांना आणायचं, इथपर्यंत ठिक आहे. पण जमिनीवर जर अशाप्रकारचे राजकारण होत राहिले, तर ते राज्यासाठी फार पोषक आहे, असे म्हणता येणार नाही. भविष्यात जे तरूण-तरूणी राजकारणात येऊ इच्छितात, त्यांना हेच राजकारण आहे, असे वाटू शकेल. त्यामुळे राजकारण आणखी खराब होत राहिल”, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारावर प्रतिक्रिया दिली. “मला असं वाटतं की आमदार गणपत गायकवाडांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याच्या खोलात जायला हवं. एखादा माणूस इतक्या टोकाला का जाईल? एखादा माणूस पोलीस ठाण्यात घुसून गोळीबार का करेल? हेदेखील तपासलं पाहिजे. कुठलीही व्यक्ती इथपर्यंतचा निर्णय का घेत असेल? पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार करण्यापर्यंत टोकाचं पाऊल का उचललं असेल? त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल? इतक्या टोकाचं पाऊल उचलण्याची परिस्थिती का उद्भवली असेल. हे प्रकरण इथपर्यंत कोणी आणलं? याबाबतची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.