रेतीच्या प्रमाणाचा अंदाज नसल्याने शासनाची फसगत होण्याची शक्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धरणात साचलेल्या गाळाच्या उपशादरम्यान हाती लागणाऱ्या रेतीतून उत्पन्नाचा नवीन स्त्रोत शोधण्यासाठी निवडलेल्या पाचपैकी गिरणा आणि गोसीखुर्द धरणात नेमका किती गाळ आहे, याबद्दल खुद्द जलसंपदा विभागच अनभिज्ञ आहे. या दोन धरणांचे आजवर कधी गाळ सर्वेक्षण झालेले नाही. उर्वरित हतनूरमध्ये सर्वाधिक म्हणजे ३७.९८ टक्के, जायकवाडीत ४.८७ आणि उजनी धरणात १०.८२ टक्के इतका गाळ आहे. या गाळात रेतीचे प्रमाण किती हेदेखील अस्पष्ट आहे. गाळ काढल्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता वाढेल. शिवाय, शेत जमिनीला सुपीक करण्यासाठी गाळाचा उपयोग होईल. मात्र, धरणातील गाळात रेतीचे प्रमाण किती, याचा अंदाज न बांधताच उपसा प्रक्रिया राबविल्यास त्यात शासनाची फसगत होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mud pumping project at nashik water resources department
First published on: 01-08-2017 at 02:06 IST