जिल्ह्य़ात दुष्काळी परिस्थितीत भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून शांतिलाल मुथ्था यांनी सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांचे कार्य निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत खासदार गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केले.
बीड जिल्ह्य़ातील डोंगरकिन्ही येथील तलावातील गाळ काढण्याच्या भारतीय जैन संघटनेच्या कामास मंगळवारी (दि. २८) रात्री खासदार मुंडे यांनी भेट दिली. यावेळी विजय बंब, नितीन कोटेचा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, किशोर पगारिया आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार मुंडे म्हणाले, जिल्ह्य़ात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. मात्र, शासनाने निधी देण्यास दिरंगाई केली. औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण केल्यामुळे दुष्काळी भागासाठी १२ कोटींचा निधी मिळाला. शांतीलाल मुथ्था यांनी दुष्काळी जनतेला मदत करण्यासाठी कार्य हाती घेतले आहे. मुथ्था यांच्या प्रयत्नांमुळे तलावातील गाळ उपसण्याचे काम तडीस जात असल्याचेही खासदार मुंडे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 30th May 2013 रोजी प्रकाशित
भारतीय जैन संघटनेचे कार्य कौतुकास्पद -खासदार मुंडे
जिल्ह्य़ात दुष्काळी परिस्थितीत भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून शांतिलाल मुथ्था यांनी सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांचे कार्य निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत खासदार गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केले.
First published on: 30-05-2013 at 08:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Munde appreciate work of bharatiya jain sanghatana